शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Exclusive : 'संभाजी भिडेंचे विचार बहुजन समाजाला मारक; त्यांच्यावर गुन्हेगारी कारवाईच हवी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 19:00 IST

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची फेसबुकवर लाईव्ह मुलाखत घेतली.

मुंबई : संभाजी भिडे यांच्याबाबत माझी अजिबात मवाळ भूमिका नव्हती. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारवाई करणार नाहीत याची खात्री असल्याचे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी यामागचे कारणही सांगितले. पुढील सरकार आल्यावर भिडेंवर कारवाई करणार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची फेसबुकवर लाईव्ह मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या विविध मुद्यांवर परखड भाष्य केले. एका प्रश्नावर त्यांनी संभाजी भिडेंबाबतची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही तोंडसुख घेतले. 

कितीही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला तरीही संभाजी भिडे हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत, प्रचारक होते. त्यांना आरएसएसने विशिष्ट कामगिरी दिलेली आहे, हे काम ते करतायत. त्यांचे खरे स्वरूप, खरे विचार हे बहुजन समाजाला मारक आहेत. जातीवादाचे विष ते पेरत आहेत यामुळे गुन्हेगारी कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. 

Exclusive : प्रकाश आंबेडकरांची पहिल्यापासूनच मते फोडण्याची भूमिका; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

यानंतर उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर पुरोगामी विचारवंतांच्या हत्याप्रकरणी ताशेरे ओढलेले असताना चार वर्षेया सरकारने तपास केला नाही. तुमच्या सरकारच्या काळातही तपास झाला नाही. असा प्रश्न विचारला असता, त्यांनी न्यायालयाचे ताशेरे फडणवीसांसाठीच होते, असे स्पष्ट केले. त्यांच्याकडे किती खाती आहेत. सांभाळायला जमत नाहीत का, असा उल्लेख न्यायालयाने केला आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच दाभोलकरांची हत्या आपल्या काळातच झाल्याचे मान्य केले. मात्र, आमच्या सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. पोलिसांनी दाभोळकर हत्येचा तपास केला. बरेच धागेदोरे मिळाले, पण अंतिम निर्णयाप्रत आले नाही. कोणाला अटक व्हावी असे पुरावे नव्हते. त्यानंतर पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या झाली. आता पुढे आले आहे की एकच संघटना आहे. यामुळे सरकार याबाबत गंभीर नाही ही टीप्पणी न्यायालयाने केल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसHigh Courtउच्च न्यायालय