शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

Maratha Reservation: “शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 5:24 PM

Maratha Reservation: यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही. आता शिंदे-फडणवीसांनी यात लक्ष घालावे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, यातील काही जणांच्या शपथविधीवरून महाविकास आघाडीतील नेत्यांसह अन्य नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. यातच आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, मराठा आरक्षण आणि अन्य मुद्द्यांवर भाष्य केले. 

महाविकास आघाडी सरकारने सरकार स्थापन करण्यासाठी ३० दिवस घेतले होते. आता या नव्या सरकारने ३५ ते ४० दिवस घेतले त्यामुळे एकूण ६० ते ६५ दिवस असेच गेले. असो काही हरकत नाही जे जनतेच्या सेवेसाठीचे वाया गेलेले दिवस आहेत ते भरून काढावेत आणि चांगले जोमाने काम करावे. महाराष्ट्रात अनेक ज्वलंत विषय आहेत प्रश्न आहेत ते सोडवणे गरजेचे होते मात्र असो उशीर झाला तरी त्यांना आमच्या शुभेच्छा, असे संभाजीराजे यांनी सांगितले.  

मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही

यापूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही. मी आमरण उपोषण केल्यानंतर एकनाथ शिंदेदेखील त्यावेळी आले होते तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते मात्र आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले त्या दोघांनी लक्ष घालावे आणि मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यावर जे आरोप आहेत मात्र त्यांना मंत्रिमंडळात घेतले असेल तर त्याबाबत मुख्यमंत्रीच त्याचे उत्तर देतील. मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रवक्ते आहेत ते यावर उत्तर देतील, असे सांगत संभाजीराजे यांनी याविषयावर अधिक बोलणे टाळले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस