शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

Sambhaji Raje Chhatrapati: “व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी, विरोधक राजकारण करत आहेत”; संभाजीराजे संतापले! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 9:54 AM

Sambhaji Raje Chhatrapati: महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना केली, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Sambhaji Raje Chhatrapati: राज्यातील राजकारणात विरोधक महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप व शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी राजकारणी सोडताना दिसत नाहीत. यातच ठाण्यातील घटनेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. यातच आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी, विरोधक राजकारण करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, महाराष्ट्रासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा असताना व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत, हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी आम्ही स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे, असे संभाजीराजे यांनी नमूद केले. तसेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर टीका करताना वापरलेल्या भाषेवरूनही संभाजीराजे यांनी कानपिचक्या दिल्या.

विकासाच्या मुद्द्यावर बोलले तरच सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल

व्यक्तीद्वेष ठेवून कुणीही राजकारण करु नये. व्यक्तीद्वेष ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खरेतर विकासाचे ध्येय समोर ठेवून राजकारण केले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर बोलले तरच सुसंस्कृत महाराष्ट्र घडेल. सत्तेवर असलेल्यांनी किंवा नसलेल्यांनी व्यक्तीद्वेष सोडून विकासाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे. लोकांना काहीतरी आवडते म्हणून काहीही बोलणे हे टाळले पाहिजे, असे स्पष्ट मत संभाजीराजे छत्रपती यांनी मांडले. 

दरम्यान, आताच्या घडीला महाराष्ट्र किती अडचणीत आहे, हेही बघितले पाहिजे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा असताना व्यक्तीद्वेष समोर ठेवून सत्ताधारी आणि विरोधक राजकारण करत आहेत. हे महाराष्ट्राचे फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी आम्ही स्वराज्य या संघटनेची स्थापना केली आहे, असे संभाजीराजेंनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती