शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Sambhajinagar: संभाजीनगर, धाराशीव... शहरांच्या नामांतराचा निर्णय उद्याच्या कॅबिनेटमध्ये घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 17:12 IST

नामांतराच्या निर्णयाला स्थगिती का दिली, याचेही सांगितलं कारण

Sambhajinagar: ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचाही निर्णय घेतला होता. या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. या स्थगितीनंतर, संजय राऊतांसह अनेक नेतेमंडळींनी हा निर्णय हिंदुविरोधी असल्याचे म्हटले. पण आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या विषयावर स्पष्टीकरण दिले. ठाकरे सरकारने जेव्हा हे निर्णय घेतले होते त्यावेळी त्यांचे सरकार अल्पमतात होते. त्यामुळे हे निर्णय स्थगित करून उद्याच्या कॅबिनेटमध्ये पुन्हा नव्याने निर्णय घेणार अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयावर उद्याच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करणार आहोत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहोत. सरकार अल्पमतात असताना कॅबिनेट घेतली. दोनशे तिनशे निर्णय घेतले. ही कॅबिनेट बेकायदेशीर होती. त्यामुळे उद्या अधिकृत कॅबिनेट घेऊन नामांतरावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर अखेर नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. 

बंडखोरी करण्याबाबतच्या निर्णयावरही त्यांनी मत व्यक्त केले. शिवसेनेला आणि शिवसैनिकांना वाचवण्यासाठी मी हा निर्णय घेतला. ही भूमिका सगळ्यांना न्याय देणारी आहे. पुण्याच्या रस्त्यावर पंढरपूरला जाताना माझं स्वागत करत होते. लोकांच्या भावना बघितल्या, त्यांचा आशीर्वाद घेतला. माझा हे  सगळं करण्यामागे काहीच स्वार्थ नव्हता. एक, दोन नाही तर पन्नास लोक माझ्यामागे आहे. मला मुख्यमंत्री करणार असं सांगत होते. पण मी मुख्यमंत्री पदासाठी आलोच नव्हतो. आपला पक्ष मोठा करण्यासाठी आणि आपल्या माणसांचं म्हणणं ऐकलं गेलं पाहिजे म्हणून मी आलो, असेही यावेळी एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरे