शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

समीरचा जामीन फेटाळण्याची मागणी

By admin | Published: January 21, 2016 3:35 AM

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड हा जामिनावर सुटल्यास, तो साक्षीदारांवर दडपण आणून त्यांना फितूर करण्याची शक्यता आहे

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड हा जामिनावर सुटल्यास, तो साक्षीदारांवर दडपण आणून त्यांना फितूर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद सरकारी वकील चंद्रकांत बुधले व तपास अधिकारी चैतन्या एस. यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर बुधवारी केला. त्यावर शुक्रवारी सुनावणी होईल.पानसरे हत्येप्रकरणी १४ डिसेंबरला आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीरवर दोषारोपपत्र दाखल झाले. पोलिसांनी ३९२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केल्याने हा खटला या न्यायालयात चालू शकत नाही, असे सांगत डांगे यांनी तो जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग केला. १३ जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश बिले यांच्यासमोर सुनावणी झाली. समीरने हा खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून अन्यत्र चालवावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील निर्णयानंतर सुनावणी सुरू होईल, असे बिले यांनी सांगितले. समीरच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यावर तपास अधिकारी चैतन्या एस. यांनी अभिप्राय दिला. त्यामध्ये ज्योती कांबळे, अंजली गरकर, सुमित आमनकर यांच्या समीरशी झालेल्या मोबाइलवरील संवादावरून त्याचा पानसरेंच्या खुनाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्याची जामिनावर मुक्तता होऊ नये, असे सरकारी वकील अ‍ॅड. बुधले यांनी सांगितले. समीरचा रुद्र पाटीलशी संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पाटील हा फरार आहे. खटल्याचा निकाल होईपर्यंत समीरला जामिनावर सोडू नये, असा युक्तिवाद त्यांनी केला. (प्रतिनिधी)