शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 08:34 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना लक्ष्य केले. त्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे. 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पक्षांच्या हालचाली सुरू झाल्यात. मनसेनेही विधानसभेची तयारी सुरू केलीय. नुकतेच उद्धव ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंब्यावरून राज ठाकरेंची खिल्ली उडवली त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात शाब्दिक संघर्ष दिसून येत आहे. मनसेवर कधीही न बोलणारे उद्धव आणि आदित्य ठाकरे हे आता मनसेवर बोलतायेत. कारण त्यांच्या मनात भीती आहे असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. 

एका मुलाखतीत संदीप देशपांडे म्हणाले की,  जसजसं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकत आहे तसं ते मनसेवर बोलायला लागलेत. याआधी ते आमच्यावर बोलायला तयार नव्हते. आज लोकांचा प्रतिसाद आणि राज ठाकरेंना मिळणारा पाठिंबा यामुळे त्यांना भीती वाटतेय. लोकसभा निवडणुकीत मराठी माणसांची मते त्यांना मोठ्या प्रमाणात पडली नाहीत. त्यामुळे त्याची भीतीही त्यांच्या मनात बसली आहे असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय केवळ वरळीच नाही तर इतर विधानसभा मतदारसंघातही मनसेची तयारी सुरू आहे. वरळी त्यातील एक आहे. मागील काही दिवसांत अनेक बैठका घेण्यात आल्यात. कार्यकर्त्यांना सक्रीय केले जात आहे. आम्ही लोकांशी बोलतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय. वरळीत जे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आहेत, ते ५ वर्ष लोकांशी बोलले नाहीत. त्यांच्याशी संपर्क ठेवला नाही. लोकांना याचं दु:ख आहे. ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिले, ते आमदार भेटत नाहीत, संपर्कात राहत नाही त्यामुळे ते नाराज आहेत असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

दरम्यान, आम्हाला २००-२२५ जागांवर लढण्याची तयारी ठेवा, असा आदेश राजसाहेबांनी दिलाय. त्यामुळे त्या त्या मतदारसंघात मनसेची तयारी सुरू झाली आहे. पुढील काळात काय होईल हे सांगता येत नाही. अद्याप युतीबाबत कुठलीही बोलणी नाही. जो काही निर्णय असेल ते राज ठाकरे घेतील. मागील २ विधानसभा निवडणुकीत मनसेचा परफॉर्म्स चांगला नसला तरी मतांमध्ये आमच्या वाढ झालीय. २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मनसेला अधिक मते मिळाली आहेत. कोरोना काळात मनसेनं जे काम केलं, महाराष्ट्रात राजकारणाची खिचडी झालीय त्यामुळे लोकांमध्ये इतर पक्षांबद्दल राग आहे. त्यात मनसेकडे पर्याय म्हणून लोक बघतायेत असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला. 

...तर मी लढेन आणि जिंकेनही

अमित ठाकरे प्रत्येक ठिकाणी बैठका घेत आहेत. त्यात वरळी मतदारसंघ हा एक भाग आहे. ते वरळीतून निवडणूक लढतील असं काही नाही. जो योग्य उमेदवार असेल त्याला तिकीट दिलं जाईल. मला उमेदवारी मिळाली तर पूर्ण ताकदीने मी वरळीतून उभा राहीन आणि जिंकेन असा विश्वास देशपांडेंनी व्यक्त केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेAaditya Thackerayआदित्य ठाकरेvidhan sabhaविधानसभा