शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

सांगलीला मंत्रीपदाचे आणखी एक स्वप्न

By admin | Published: January 01, 2015 11:14 PM

आमदारांना आशा : एका पदासाठी चौघांची दावेदारी; समर्थक जोशात

सांगली : मुंबईवाऱ्या, चर्चेच्या फेऱ्या आणि नेत्यांना साकडे घालूनही मंत्रीपदापासून वंचित राहिलेल्या सांगली जिल्ह्याला सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक स्वप्न दाखविले. मंत्रीपदाचे हे स्वप्न आहे की गाजर, याची पुरेशी खात्री अजूनही झाली नसली तरी, जिल्ह्यातील चारही आमदार समर्थकांची दावेदारी पुन्हा सुरू झाली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात नेहमीच सांगलीचा दबदबा राहिला आहे. आजवरची ही परंपरा नव्या भाजप सरकारने खंडित केल्यामुळे भाजपमध्ये सध्या नाराजी दिसत आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यास खिंडार पाडून तब्बल ५0 टक्के जागांवर भाजपचा झेंडा फडकविणाऱ्या भाजप आमदारांना मंत्रिमंडळापासून मात्र दूर ठेवण्यात आले आहे. आजवर दोन शपथविधी पार पडले. पहिल्याच शपथविधीत सांगलीला एक तरी मंत्रीपद मिळणारच, अशी खात्री जिल्ह्यातील भाजप नेत्यांना होती. त्यासाठी चारही आमदार, खासदार आणि प्रमुख नेते मुंबईत ठाण मांडून होते. पण मुख्यमंत्र्यांसह झालेल्या पहिल्या शपथविधीत त्यांचे स्वप्न भंगले. दुसऱ्या शपथविधीला तरी हमखास मंत्रीपद मिळणारच, या आशेने पुन्हा ‘फिल्डिंग’ लावण्यात आली. खासदार संजय पाटील यांच्यासहीत मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांनी स्वतंत्रपणे नेत्यांकडे ताकद लावली. त्यासाठी चर्चेच्या फेऱ्या झाल्या. प्रदेशाध्यक्षांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच सांगलीच्या आमदारांना ‘सलाईन’वर ठेवले. अनेकदा मंत्रीपदाचे गाजर दाखविले. त्यामुळे दुसऱ्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण या शपथविधीतही सांगलीच्या पदरात काहीही पडले नाही. इच्छुक आमदारांसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी लपवित मंत्रीपद मिळण्याची आशा सोडून दिली. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्तीही झाली. उसना पालकमंत्री मिळूनही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. या स्वागतामागे दडलेली नाराजी चंद्रकांत पाटील यांनी ओळखली होती. म्हणूनच त्यांनी मी प्रभारी पालकमंत्री असल्याचे सांगून निराश झालेल्यांना पुन्हा नवे स्वप्न दाखविले. लवकरच राज्यात १२ मंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्यात भाजपच्या वाट्याला ६ आणि मित्रपक्षांच्या वाट्याला ६ मंत्रीपदे मिळणार असल्याचे सांगतानाच, यातील एक मंत्रीपद सांगलीला निश्चित मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे औपचारिक स्वागताची जागा उत्साहाने घेतली. कार्यकर्त्यांसह आमदारांच्या समर्थकांत पुन्हा मंत्रीपदाचे स्वप्न फुलले. आता हे स्वप्न आहे की गाजर, अशी शंकाही काही बेरक्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केली आहे. मंत्रीपदाची आशा जिल्ह्यातील भाजपच्या चारही आमदारांना आहे. शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, विलासराव जगताप आणि सुधीर गाडगीळ या चारही आमदारांच्या समर्थकांची आता पुन्हा दावेदारी सुरू केली आहे. खरोखर बारा मंत्र्यांचा शपथविधी होणार का? तो कधी होणार आहे? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. (प्रतिनिधी)....कॅबिनेटपासून राज्यमंत्रीपदापर्यंतसांगलीला किमान दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार, अशी मोठी स्वप्ने विधानसभेनंतर रंगविली गेली. आघाडी सरकारच्या कालावधित तीन कॅबिनेट मंत्रीपदे जिल्ह्याला होती. त्यामुळे या मोठ्या स्वप्नाबद्दल फारसे कोणाला आश्चर्य वाटले नाही. पहिला शपथविधी पार पाडल्यानंतर किमान दोन मंत्रीपदे तरी मिळतील, असे भाजपचे नेते सांगू लागले. दुसऱ्या शपथविधीवेळी एकतरी नक्कीच खाते मिळणार असा दावा केला जाऊ लागला. दुसऱ्या शपथविधीनंतर दावेदारीच बंद झाली. चंद्रकांत पाटील यांच्या आशावादानंतर आता राज्यमंत्रीपद तरी मिळू दे, म्हणून भाजपचे नेते देवाला साकडे घालू लागले आहेत, अशी चर्चा आहे.