शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 10:29 IST

Sangli loksabha Election - सांगली इथं मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आले होते, त्यावेळी निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवरून राऊतांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित केली. 

सांगली - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ११ दिवसांनी, दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर ३ दिवसांनी आकडेवारी दिली आहे. तिथल्या सर्व मतदारसंघात अचानक ५-६ टक्के मतदानात वाढ झाल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत आलंय. नांदेडला मतदान संपताना ५२ टक्के मतदान होते, तिथे ६२ टक्के मतदान कसे झाले?, निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीचे आकडे जाहीर केले ते धक्कादायक, ११ दिवस मतदान टक्केवारी जाहीर करायला कसे लागतात अशी शंका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे.

सांगलीत पत्रकारांशी संजय राऊतांनी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, डिजिटल इंडियात संध्याकाळपर्यंत किती मतदान झाले याचे आकडे आम्हाला समजत होते, पण आश्चर्य असे फक्त नागपूर मतदारसंघात अर्धा टक्के मतदान कमी दाखवलं आहे. नागपूर सोडून सगळीकडे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालीय. ही वाढ अचानक कशी झाली, हे वाढलेले मतदान कुणी केले, कुठे गेले, ११ दिवस का लागले. हा प्रश्न देशातील जनतेला प्रश्न पडलेत. भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून ते मोदी-शाह यांच्या हातातील बाहुले झालंय का असा सवाल त्यांनी केला.

तसेच पाकिस्तानात निवडणूक लष्कर ठरवतं, कुणाला आघाडी द्यायची, कुणाला पाठिमागे टाकायचे हे पाकिस्तानात लष्कर ठरवतं, तशाच प्रकार भारतात होत आहे. भाजपा मतदाना कमी पडला, त्यातून अचानक मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ११ दिवसांत वाढलेले मतदान आले कुठून? मतपत्रिकेवर मतदान होत होते, तेव्हाही संध्याकाळी ७ पर्यंत आकडेवारी सांगितली जायची. यावेळी डिजिटल इंडिया त्यादिवशी संध्याकाळी आलेली आकडेवारी आणि त्यानंतर ११ दिवसांनी आलेली नवीन आकडेवारी यामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा माती खाल्ली ही अतिशय गंभीर गोष्ट आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं.

स्फोट घडवावा असं देवेंद्र फडणवीसांकडे काही नाही

देवेंद्र फडणवीसांकडे काहीही गोपनीय माहिती नाही, स्फोट करावा असं त्यांच्याकडे काही नाही. फडणवीस लवंगी फटाका इतकाच आवाज करू शकतात. उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यापलीकडे ते काहीही करू शकत नाही. मोदी-शाह यांनी तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं नाही. तिथे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद देणार कसं? देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून भरकटलेल्या सारखे बोलतायेत, महाराष्ट्रात लोकसभा, राज्याची विधानसभा हरतायेत. ज्याप्रकारे राजकारण फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू केले, त्या भयातून ते लवंगी फटाकी फोडतायेत असंही संजय राऊतांनी सांगितले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४