शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर...; सांगलीत संजय राऊत कडाडले, सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 6:25 PM

Lok sabha Election 2024: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा असताना आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर गेले. तिथे चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगलीचा वाद १-२ दिवसांत मिटेल असा दावा राऊतांनी केला.

सांगली - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून अद्याप तिढा आहे. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील लढण्यास इच्छुक आहेत. परंतु त्याठिकाणी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही जागा आम्हालाच मिळावी यासाठी स्थानिक काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. त्यात ठाकरे गटाकडूनही उमेदवार मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढत होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावरच सांगलीत संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा दिला आहे.

संजय राऊतांनी म्हटलं की, मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करत असेल तर त्याला राजकीय परिपक्वता म्हणत नाही. हे मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर राज्यातील ४८ जागांवर तशा लढती होईल. आघाडी किंवा युती असो कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही. एकतर मैत्री होते किंवा लढत होते असा सूचक इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे. संजय राऊत हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराचा ते आढावा घेत आहेत.

त्याचसोबत चंद्रहार पाटील हे दिल्लीत जाणार आहे. महाविकास आघाडी राज्यात ३ पक्षांनी स्थापन केली. अडीच वर्ष सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उत्तम चालवलं. ज्यारितीने हे सरकार पाडलं त्याचा जनतेमध्ये रोष आहे. २०२४ च्या निवडणुकीत जो अबकी बार ४०० पार नारा दिला आहे. तो किती भंपक, फसवा आहे हे निकालानंतर कळेल. नरेंद्र मोदी कुठल्याही परिस्थितीत देशात पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत आणि त्यांचा पक्ष सरकारमध्ये येणार नाही हे जनमानस आहे असं संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. गेमचेंजिंगची जबाबदारी महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि दिल्ली ही राज्ये निर्णयाक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. राज्यातील ४८ पैकी किमान ३५ हून अधिक जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत. लोकसभेच्या जागावाटपात तिन्ही पक्षांनी काळजीपूर्वक भूमिका बजावली आहे. आघाडी, युती म्हटली की एकादुसऱ्या जागेवर वाद होतो. प्रत्येक कार्यकर्त्याला हा मतदारसंघ आपल्यालाच सुटावा असं वाटतं. कार्यकर्त्यांच्या भावनेचा मान राखला पाहिजे. मुंबईत आमची ताकद आहे. तिथे ४-५ जागा आम्ही लढतोय. सांगलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनेचा राजकीय नेता म्हणून आदर करतो असं संजय राऊतांनी म्हटलं.

सांगलीचा वाद १-२ दिवसांत मिटेल 

कोल्हापूर, रामटेक या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्यात. अमरावती जागा लढतो आणि जिंकतोय तीही जागा आम्ही काँग्रेसला दिली. देवाणघेवाण आघाडीत होत असते, त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका होती. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला. १-२ दिवसांत सांगलीतील काँग्रेसची भूमिका शांत होईल. विशाल पाटील, विश्वजित कदम हे दोघेही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. उद्याच्या राजकारणात विशाल पाटलांना नक्कीच महत्त्वाची भूमिका मिळेल त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल. आम्ही एक प्रस्ताव दिल्लीत काँग्रेस वरिष्ठांकडे पाठवला आहे. त्यानुसार चर्चा होईल आणि १-२ दिवसांत सांगलीतील वाद शांत होईल 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस