शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
4
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
5
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
6
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
7
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
8
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
9
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
10
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
11
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
12
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
13
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
14
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
15
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
16
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
17
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
18
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
19
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
20
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू

काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 15:54 IST

Sangli Loksabha Election 2024: सांगलीतील चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत जिल्ह्यात फिरत आहेत. याठिकाणी राऊतांनी चंद्रहार पाटलांना विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. 

सांगली - Sanjay Raut on Congress-NCP ( Marathi News ) काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन रॅलीत सहभागी व्हावं अन्यथा सांगलीतील जनता तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ते बोलत होते. सांगलीतील जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तिथं काँग्रेसचे विशाल पाटील लढण्यास इच्छुक आहेत. परंतु ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि ती उमेदवारी मागे घेण्यास ठामपणे नकार देत आहेत. 

चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आलेले संजय राऊत म्हणाले की, सध्या सांगलीतील राजकीय वातावरण तापलं आहे. चंद्रहार पाटील प्रचारात पुढे पुढे जातील तसं इथल्या विरोधकांची डोकी तापतील. शिवसेना सांगलीत कशी हा प्रश्न भाजपासह काँग्रेसला पडलाय. परंतु हा प्रश्न जिल्ह्यातील १-२ लोकांना पडलाय, देश आणि राज्यातील नेत्यांना नाही. सांगली जिल्ह्यातील मक्तेदारी आमच्याकडेच राहावी. विशिष्ट घराण्याकडेच राहावी. ज्यांच्या हातात कारखाने, बँका, शैक्षणिक संस्था आपल्याच ताब्यात राहाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. सामान्य शेतकऱ्याच्या मुलानं विधानसभेत, संसदेत जाऊ नये. या जनतेनं आमचे गुलाम म्हणून राहायचं असं त्यांना वाटतं. सामान्यातला सामान्य माणूस आमदार, मंत्री, खासदार, जिल्हा परिषदेत गेला पाहिजे यासाठी ही लोकशाही आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच पश्चिम महाराष्ट्रात काहींना ही लोकशाही मान्य नाही. ५०-६० वर्षे आपली घराणी चालली पाहिजे. जोपर्यंत ती घराणी आहेत तोपर्यंत लोकशाही आहे. या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरेंनी आणि शिवसेनेनं केलं. शिवसेनेचा इतिहास पाहिला तर सामान्य माणूस, नोकरदार, मजुरी करणाऱ्याला शिवसेनेनं महापौर केला होता. वॉचमॅन, कर्मचारी असे आमदार झाले. मराठवाड्यात साखर कारखान्याच्या गेटवर तिकिट फाडणारे आमदार, मंत्री झाले. एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे. आमच्याकडे पैसे आहेत, बापजाद्यांकडे पैसे आहेत. त्यामुळे आमची पोरं खासदार, मंत्री झाले पाहिजे हे मक्तेदारी शिवसेनेनं मोडली असं सांगत संजय राऊतांनी पश्चिम महाराष्ट्रातील घराणेशाहीवर टीका केली. 

दरम्यान, सांगलीत शेतकऱ्याचा मुलगा खासदारकीला उभा केला असेल, जो दोनदा महाराष्ट्र केसरी झाला, सांगलीतील शान वाढवली, क्रिडा क्षेत्रात मान वाढवला आहे. हा तरुण काहीतरी करू शकेल, आमचा आवाज उचलेल हा विश्वास वाटल्याने उद्धव ठाकरेंनी सांगली लढवण्याचं ठरवलं. चंद्रहार पाटील आल्यानंतर सांगली लोकसभा लढवायचीच हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन केलंय, तुमची नौटंकी आता बंद करा आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन यात्रेत सामील व्हा. नाहीतर लोक तुम्हाला सांगलीत माफ करणार नाहीत. चंद्रहार पाटील यांना मोठ्या संख्येने मेहनत करून मताधिक्य मिळवून द्यायला हवं. कवठे महाकांळ मतदारसंघातून प्रामाणिक नेतृत्व पुढे आले. अशा माणसाच्या मागे उभं राहून आपण बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना दिली पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलं. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस