शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

सांगलीची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर

By admin | Published: April 29, 2015 11:37 PM

प्रदूषणाचा कहर : दमा आणि सीओपीडी रुग्णांमध्ये सात टक्क्यांनी वाढ--लोकमत विशेष

नरेंद्र रानडे - सांगलीघनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा, ई-कचऱ्याची समस्या, औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाकडे दुर्लक्ष आदी प्रमुख कारणांमुळे शहरातील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालात वायू प्रदूषणाचा स्तर वाढलेल्या शहरांमध्ये सांगलीचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी सांगलीच्या घनकचरा, नदी प्रदूषणाचा प्रश्नही दिल्लीपर्यंत गाजला. सांगलीच्या प्रदूषणाची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर टांगली गेली तरी, त्याचे गांभीर्य प्रशासकीय पातळीवर दिसत नाही. महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे ११० टन कचरा जमा होतो. सांगली जिल्हा सुधार समितीच्या सर्वेक्षणानुसार वीस टन कचरा हा प्लॅस्टिकमिश्रित असतो. वास्तविक या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानुसार विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. ओला, सुका तसेच प्लॅस्टिकमिश्रित कचरा एकत्रितरित्याच गोळा करण्यात येत आहे. काहीवेळा उपनगरांमधील कचरा कोंडाळ्यातच पेटविण्यात आल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. ई-कचऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर आहे.वाढत्या वायुप्रदूषणाने मागील काही महिन्यांपासून दमा आणि सीओपीडी (क्रॉनिक आॅपस्ट्रक्टीव्ह पलमोगरी डिसीज) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रदूषणाचा अहवाल गायबमहाराष्ट्र महापालिका, नगरपालिका अधिनियम १९९४ च्या कलम ६७ नुसार दरवर्षी वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणाचा अहवाल तयार करून तो महासभेत मांडायचा असतो. तत्कालीन आयुक्त मिलिंद म्हैसकर यांच्या कालावधित २००४-०५ चा प्रदूषण अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानंतर दहा वर्षे महापालिकेने हा अहवालच सादर केला नाही. आरोग्य धोक्यातसीओपीडी आजारात फुफुसाची कार्यक्षमता कमी होते. परिणामी रुग्णांमध्ये दम लागणे, सतत खोकला येणे, छातीतून घरघरणे आदी लक्षणे दिसून येतात. सध्या वाढत्या वायू प्रदूषणामुळे प्रामुख्याने ३५ ते ४० वयोगटातील रुग्णांमध्ये याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. कमाल मर्यादा ओलांडल्यामहापालिकेच्या २००४-०५ च्या अहवालात ध्वनी, वायू आणि जलप्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले होते. शहरातील नागरी, औद्योगिक भागात तरंगणारे घटक, सल्फरडाय आॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड यांचे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा दुप्पट झाले होते. गेल्या दहा वर्षांत यात मोठी भर पडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही याबाबत गाफील आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्य आहे. परंतु हे मंडळ केवळ नोटीसबहाद्दर म्हणूनच ओळखले जाते. मंडळ कार्यशील आहे, हे जनतेला दाखविण्यासाठी ‘कारवाई’ला नव्हे, तर संबंधितांना नोटीस पाठविण्यालाच प्राधान्य देण्यात येत आहे. - अ‍ॅड. अमित शिंदे, अध्यक्ष, सांगली जिल्हा सुधार समिती.वाढत्या वायुप्रदूषणामुळे तरुण वयातच सीओपीडी आणि दमा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांनी तातडीने उपचार घेणे आवश्यक असून या आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमित प्राणायम आणि शहरात फिरताना पूर्ण बंद असलेले हेल्मेट अथवा मास्क वापरणे आवश्यक आहे. - डॉ. अनिल मडके, छातीरोगतज्ज्ञ, सांगली.नागरिकांना स्वच्छ हवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने नियमानुसार प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नसल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण कार्यालयाविरुध्द कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.- डॉ. ज्ञानचंद्र पाटील, अध्यक्ष, ग्राहक पंचायत सांगली.राज्यातील प्रदूषित अठरा शहरांमध्ये सांगलीचा समावेश असल्याचे समजले. परंतु संबंधितांनी यासाठी कोणता आधार घेतला आहे, हे समजू शकले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ आपले कार्य करीत असून नागरिकांनीही वायुप्रदूषण होऊ नये यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे.- जयवंत हजारे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली.