शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 14:34 IST

Sanjay Raut News: राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशाने राहुल गांधींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान होत असून, मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आहे. यानंतर ०४ जून रोजी मतमोजणी आहे. लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळण्याविषयी इंडिया आघाडी आणि एनडीए दोन्ही गटाकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राजकीय वर्तुळासह जगाच्या नजरा आता ०४ जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागले आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ०४ जून रोजी इंडिया आघाडी जिंकत आहे, असा दावा केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ०४ जून रोजी इंडिया आघाडी जिंकत आहे. १२ वाजल्यानंतर तुम्हाला कळेल इंडिया आघाडीचा पंतप्रधान होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे त्यांची चॉइस असल्याचे सांगितले असून, मीही सांगतो की, संपूर्ण देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत. आम्ही सर्व राहुल गांधी यांच्या पाठी उभे राहू. राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशाने राहुल गांधींना स्वीकारले आहे. राहुल गांधींचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

निवडणूक आयोग जनतेची सोय बघत नाही

निवडणूक आयोगाला हाताशी पकडून सेलिब्रिटींच्या सोयींसाठी तारखा घेतल्या आहेत. पंतप्रधानांनी शेवटच्या टप्प्यात स्वत:चे मतदान ठेवले. निवडणूक आयोग जनतेची सोय बघत नाही, तर राजकारणातील सेलिब्रिटींची सोय बघत आहे. हे सत्य आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच राज्यातील सरकार घटनाबाह्य आहे. भ्रष्टाचारातून निर्माण झालेले हे सरकार आहे.  सरकारचा बेकायदेशीर मुख्यमंत्री आम्हाला नोटीस पाठवतो. महाराष्ट्रात या लोकांनी पैशाचा पाऊस पाडला. फोटोसोबत ट्विट केले आहे. हेलिकॉप्टरमधून पैसे आणले, आमच्याविरोधात गुन्हा दाखल करा. ०४ जूननंतर खूप मजा येणार आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आम्ही घाबरणारे लोक नाहीत. या देशात खरे बोलणाऱ्यांच्या विरोधात केस दाखल होते किंवा एफआयआर दाखल केला जातो किंवा तुरुंगात टाकलं जाते. मी जे पेपरात लिहितो, तो सत्याचा आधार असतो. आमची लढाई भाजपासोबत होती. आम्ही भाजपचा पराभव करत आहोत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पैशाचे अमाप वाटप करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितीही पैसा वाटला तरी त्यांना राज्यात यश मिळणार नाही. पण ०४ जूननंतर चक्र उलटे फिरणार आहे हे लक्षात घ्या. आम्हाला चिंता नाही. आम्हाला भीती नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४