शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

“विरोधी पक्षनेत्यांचा द्वेष करताय हे चुकीचे आहे, राज्यकर्त्यांनी...”; संजय राऊतांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 12:25 IST

Sanjay Raut News: जी-२० शिखर परिषदेच्या डीनरसाठी मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रित न करण्यावरून संजय राऊतांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Sanjay Raut News: देशात जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. जी-२० परिषदेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांसाठी डीनरचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रण नसल्यावरून आता विरोधकांकडून टीका होत आहे. 

बेल्जियम दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी तेथून सरकारवर हल्लाबोल केला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना जी-२० डीनरसाठी आमंत्रित न केल्याबद्दल सरकारवर निशाणा साधत, ६० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विरोधी नेत्यांना सरकार महत्त्व देत नाही, याचा हा पुरावा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरगेंना निमंत्रण नसल्यावरून सरकारवर जोरदार टीका केली.

तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात हे चुकीचे आहे

राज्याचे मन छोटे असेल तर असे होते. तुम्ही देवेगौडा, मनमोहन सिंग यांना बोलवलं. ते प्रकृतीमुळे येऊ शकत नाही. मात्र देशाच्या विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत. तुम्ही त्यांना बोलवत नाहीत. यावरून तुमच्या मनात भीती असल्याचे स्पष्ट होते. तुम्ही देशात जे काही करून ठेवता, त्याची पोलखोल होईल, विरोधीपक्षनेते ती करत असतात. राज्यकर्त्यांचे मन मोठे असावे लागते. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात हे चुकीचे आहे, या तीव्र शब्दांत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. 

...तर बैठकीचे स्वागत करू

पुतिन येथे आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. शेवटी काय मिळणार आहे? आमचे लक्ष आहे. लडाखमध्ये शेजारी देशाने घेतलेली जमिनीकडे परत मिळणार असेल तर आम्ही बैठकीचे स्वागत करू. या बैठकीमुळे जर भारताची ताकद वाढलेली असेल तर त्याचंही स्वागत करू, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, या देशात सर्व राष्ट्रांचे प्रमुख आलेले आहेत. भारतावरील कर्ज माफ होणार आहे का? किती खर्च झाला आहे? तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा बैठका महत्त्वाच्या असतात. मोदींनी ते केलेले आहे. इंदिरा गांधी, नेहरू असताना अशा प्रकारच्या बैठका झाल्याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली.  

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेSanjay Rautसंजय राऊत