शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
3
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
4
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
5
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
6
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
7
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
8
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
9
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

संजय राऊत २३ जागा मागतायेत, मग आम्ही कुठं लढायचं?; काँग्रेस नेत्याचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 2:50 PM

कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीचे नेते आपापसातील मतभेद दूर करून एकजुटीनं भाजपाविरोधात उभे राहायचे आणि निवडणुकीत भाजपाला पाडायचे हा संकल्प आम्ही घेतला आहे असं काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले.

नागपूर - शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत किती मते आहेत हे सध्या कुणाला माहिती नाही. परंतु काँग्रेसकडे किती मते हे सगळ्यांना माहिती आहे. आमच्याकडे नेते, कार्यकर्ते सगळे आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही एकत्र बसून निर्णय घ्या, ज्यामध्ये तुमचेही भले होईल आणि आमचेही भले होईल. भाजपाला कसं रोखायचं हे ठरवा. एकमेकांना चॅलेंज देऊ नका. सगळे समान आहेत. एकदिलाने सगळ्यांना सांभाळून निर्णय घ्यावेत. सगळ्या जागा तुम्ही मागणार मग आम्ही कुठे लढायचं? असं सांगत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना थेट सवाल विचारला आहे.  

संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेना-एनसीपी-काँग्रेस आणि बहुतेक वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित आघाडी होईल. या तयारीत प्रत्येक पक्षाला तडजोड करण्याची मानसिकता दाखवली पाहिजे. जास्तीच्या जागा घेऊन कुणी लढणार असेल तर त्यात दोन्ही पक्षाचे नुकसान आहे. सगळे एकत्र बसून चर्चा करू आणि ज्या जागा निवडून येतील त्या एकमेकांना वाटप करू. भक्कमपणे निवडणुकीत उतरून भाजपाला मिळणारे यश रोखून आम्ही दिल्लीत जाणार आहोत. लोकसभेत मोठे यश मिळेल. कोणाला कुठून लढायचे यावर पक्षाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल.वंचित बहुजन आघाडीबाबत जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ पातळीवर होईल. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येण्यासाठी इच्छुक असल्याचे दररोज दिसत आहे.त्यामुळे आमचे नेतृत्व त्यावर नक्कीच विचार करेल. १२ जागा तुम्ही घेणार मग आम्ही काय करणार? भाजपाला रोखायचे असेल तर प्रत्येक पक्षाला चर्चा करावी लागेल. संजय राऊत यांनी २३ जागा मागितल्या आहेत. सगळ्या जागा तुम्ही घेणार मग आम्ही कुठे लढणार? असं त्यांनी विचारले. 

त्याचसोबत आगामी निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगूल आम्ही आजपासून वाजवणार आहे. कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीचे नेते आपापसातील मतभेद दूर करून एकजुटीनं भाजपाविरोधात उभे राहायचे आणि निवडणुकीत भाजपाला पाडायचे हा संकल्प आम्ही घेतला आहे. बेरोजगारी, महागाई कमी करण्यासाठी, सर्वधर्म समभावाने लोकांना एकजूट करण्यासाठी काँग्रेस तयार आहे. मुंबई उत्तर पश्चिम जागेबाबत कधीही तडजोड करणार नाही. ही जागा काँग्रेसची आहे. त्याठिकाणी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस सोडणार नाही.मुंबईत ६ जागा आहेत. राष्ट्रवादीचे प्राबल्य नाही. त्यामुळे ३ जागा शिवसेना- ३ काँग्रेस असं समीकरण बनवायला हवे. यात दोन्ही पक्षाचा फायदा होईल असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला. 

काय म्हणाले होते संजय राऊत?लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांसोबत होणार नसून ती दिल्लीत होईल. आम्ही २३ जागा लढवणार आहोत, हे आम्ही दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे. काँग्रेस हायकमांडसोबत आमचे संबंध अत्यंत मधूर आहोत," असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Sanjay Nirupamसंजय निरुपमSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेना