शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

“उद्धव ठाकरेही पंतप्रधानपदासाठी इच्छुक, आमचे बोलणे काँग्रेसवाल्यांना कळत नाही”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 18:11 IST

Sanjay Raut News: आमच्या पक्षनेत्याचे नाव घेत असू, तर त्यात चुकीचे काय आहे, यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे चेहरे आहेत. तर इंडिया आघाडीकडून अद्यापही पंतप्रधानपदासाठी चेहरा कोण, यावर एकमत होऊ शकलेले नाहीत. मध्यंतरी इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानपदासाठी अनेक नेते इच्छुक आहेत, त्यात उद्धव ठाकरेही आहेत, असे विधान केले.

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील राजकारणावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २०१९ मध्ये अडीच वर्षांनंतर दिल्लीत जाऊन काम करायचे होते, त्यांना अर्थ विभागात रस होता, हा उद्धव ठाकरेंनी केलेला दावा शंभर टक्के सत्य आहे. उद्धव ठाकरेंशी फडणवीसांची चर्चा झाली तेव्हा आमचे संबंध चांगले होते. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून, दिल्लीत जाऊन अर्थमंत्री, गृहमंत्री आणि पंतप्रधान होईल, असे देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न होते. स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही. महाराष्ट्राच्या नेत्याला असे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच पाठिशी उभे राहतो. पण त्यांचे हे स्वप्न बहुधा मोदी आणि शाहांना आवडले नसावे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नांचे पंख कापण्यात आले. त्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री करण्यात आले, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली. यावेळी पंतप्रधानपदाबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

आम्ही काय बोलतो, ते काँग्रेसवाल्यांना समजत नाही

पंतप्रधानपदासाठी वाद नाहीत. आम्ही काय बोलतो, ते काँग्रेसवाल्यांना समजत नाही. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत आणि ते जर पंतप्रधानपदासाठी इच्छुक असतील, तर त्यांचे स्वागत आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी देशातील अन्य अनेक नेते इच्छुकांच्या रांगेत आहेत. ममता बॅनर्जी आहेत, अखिलेश यादव आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, उद्धव ठाकरे आहेत. यांच्यासह अनेक चेहरे पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. कोणाचे नाव घेणे गुन्हा आहे का, आमच्या पक्षनेत्याचे आम्ही नाव घेत असू, तर त्यात चुकीचे काय आहे, यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी ३०० हून अधिक जागा मिळवेल. त्यानंतर इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला जाईल. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याला सकारात्मक उत्तर दिले. इंडिया आघाडीत आणखीही नेते आहेत. इंडिया आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. देशभरात राज्य पातळीवरही अनेक नेते आहेत. नेतृत्व कुणाचे असेल हा प्रश्न आमच्यासमोर नाही. आमची लढाई हुकूमशाहीविरोधात आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४