शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
3
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
4
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
5
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
6
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
7
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
8
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
9
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
10
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
11
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
12
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
13
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
14
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
15
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
16
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
17
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
18
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
19
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
20
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

Maratha Reservation भुजबळ-जरांगे पाटलांना संजय राऊतांचा मोलाचा सल्ला; "शिवरायांच्या महाराष्ट्रात..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 11:24 AM

आज राज्यात जातीजातीत भांडणे लावून एकमेकांचे हातपाय तोडू अशी भाषा वापरणे हे दुर्दैव आहे. या राज्यातील सरकारला कुणी जुमानत नाही असा आरोप त्यांनी केला. 

मुंबई - Maratha Reservation आरक्षणासारखे विषय एकत्र बसून त्यातून निर्णय घेण्याची गरज आहे. मग छगन भुजबळ असतील, जरांगे पाटील असतील, अन्य प्रमुख नेते. तुम्ही भाषणे आणि एकमेकांना आव्हान कसली देताय? तुम्ही दिलेले आव्हान हे महाराष्ट्राच्या मूळावर येतंय.महाराष्ट्राच्या सामाजिक अखंडतेवर एकत्र येतंय. त्यासाठी सर्वांनी एकत्र बसले पाहिजे आणि यातून मार्ग काढला पाहिजे.अशाप्रकारे तुमचे नेतृत्व, तुम्हाला टाळ्या मिळतील, तुमच्या जयजयकाराच्या घोषणा होतील. पण बाळासाहेबांनी जो मंत्र दिला होता, सगळे मतभेद, जातीभेद गाडून मराठी माणसांची एकजूट उभारा आणि ती एकजूट म्हणजे शिवसेना होती हे विसरलेले दिसतायेत असा मोलाचा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, भुजबळांनी गेल्या २ महिन्यातील कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे त्यावर आता सरकारला बोलू द्या. आता यावर राजकीय पक्षाच्या भूमिका घेतायेत त्याला अर्थ नाही. यावर सरकारने बोलावे. महाराष्ट्रातील वातावरण इतके खराब झालंय की याच कारणासाठी महाराष्ट्र स्थापन केला होता का? १०६ हुताम्यांनी आजचा दिवस पाहण्यासाठी बलिदान दिले होते का? जातीय विष राज्यात कुणी कालवलं नव्हते. समाज एवढा दुभंगला नव्हता. १९४७ च्या वेळी भारत-पाक फाळणी झाली तेव्हा अशी भाषा वापरली जातेय. आज राज्यात जातीजातीत भांडणे लावून एकमेकांचे हातपाय तोडू अशी भाषा वापरणे हे दुर्दैव आहे. या राज्यातील सरकारला कुणी जुमानत नाही असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत या राज्यात बाळासाहेब ठाकरेंनंतर सर्वमान्य नेतृत्व राहिले नाही.बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांना प्रिय होते. त्यांचे सगळे ऐकत होते. सगळ्यांना एकत्र बसवण्याची ताकद त्यांच्यात होती.आज दिल्ली असो वा महाराष्ट्र समाज एकसंघ ठेवणारे नेतृत्व राहिले नाही.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आरक्षणावरून एकमेकांचे खून करू, तंगड्या, हातपाय हातात देऊ अशी भाषा दुर्दैवाने पाहावं लागतंय. अशा महाराष्ट्र सामाजिकदृष्ट्या दुंभगलेला पाहायला मिळतोय अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली. 

आम्ही श्रद्धेने अयोध्येला जाऊ, राजकारणासाठी नाही

येत्या काही दिवसांत २२ जानेवारीचं राजकारण संपल्यावर आम्हीदेखील अयोध्येला जाऊ. श्रद्धेनं जाऊ, राजकारणासाठी जाणार नाही असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यावरून राऊतांनी हे विधान केले. राम मंदिराबाबत शिवसेनेचीच भूमिका होती. राम मंदिराच्या योगदानात आमचाही तितकाच वाटा आहे जितका आज हे लोक श्रेय घेत आहेत. जेव्हा तिथे कुणी छातीवर गोळी घ्यायला तयार नव्हता तेव्हा तिथे शिवसैनिक पोहचले होते. मंदिर निर्माणच्या कार्यात आमचे योगदान होते आणि यापुढेही राहील. आदित्य ठाकरे मथुरेत श्रद्धेने नतमस्तक होण्यासाठी गेले आहेत. मुथरेत मंदिराचे लोकार्पण होणार असून त्यासाठी आदित्य ठाकरेंना तिथे आमंत्रित केले आहे. त्यामुळे आज ते तिथे गेले आहे असं संजय राऊत म्हणाले. 

मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमच्यात कुठलेही मतभेद नाही. ४८ जागा आणि उमेदवार ताकदीने लढतील आणि जिंकतील असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षण