शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"कराडला गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले", दमानियांचा नवा लेटर बॉम्ब; बालाजी तांदळे रडारवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 09:13 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जी गाडी वापरली, ती वाल्मीक कराडचा मित्र असलेल्या बालाजी तांदळेंची असल्याचे समोर आल्यानंतर तपास वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता अंजली दमानियांनी एक नवा लेटर बॉम्ब टाकला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी जी गाडी वापरली, ती बालाजी तांदळेंची आहे. बालाजी तांदळे हे वाल्मीक कराडचे मित्र असून, अंजली दमानियांनी यावरून पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बालाजी तांदळे हे २ कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडचे मित्र आहेत. त्याचबरोबर कारेगावचे सरपंच देखील आहेत. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी बालाजी तांदळेंची गाडी वापरल्याचे समोर आले असून, अंजली दमानियांनी पत्र शेअर केले आहे. 

अंजली दमानिया काय म्हणाल्या? 

"हे अतिशय गंभीर आहे. यानंतर कसा विश्वास ठेवायचा पोलीस चौकशीवर? तुमची गाडी घेऊन आरोपीला शोधा आणि आरोपी मिळताच आमच्याशी संपर्क साधावा. असा आदेश स्कॉर्पिओ नंबर MH44AD0727 चे मालक यांना बीड पोलिसांनी दिला. ह्या स्कॉर्पिओचे मालक कराडचे  मित्र बालाजी तांदळे", असे म्हणत अंजली दमानियांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

"तपास मुद्दाम भलत्याच दिशेला भरकटत नेण्यासाठी आणि कराडला गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले. हा राजकीय दबाव कुणी टाकला असेल हे वेगळे सांगण्याची गरज आहे का? एसपी अविनाश बर्फाळ, राजेश पाटील, प्रशांत महाजन, गोसावी, भागवत शेलार ह्या सगळ्यांना बरखास्त करा आणि ह्यांना बालाजी तांदळे सकट सहआरोपी करा", अशी मागणी करत अंजली दमानियांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना घेरले आहे.   

संतोष देशमुख हत्या प्रकरणात बालाजी तांदळेंना सहआरोपी करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनीही केली आहे. त्याने आरोपींचा जामीन घेतला नसता, तर हे घडलंच नसतं, असे देशमुख म्हणाले आहेत. 

पोलिसांना विचारा माझी गाडी का वापरली? -बालाजी तांदळे

दरम्यान, या मुद्द्यावर बोलताना बालाजी तांदळे म्हणाले की, "आम्ही दोन वेळा कर्नाटक, मुंबईला सात-आठ वेळा गेलो. पुण्याला पाच वेळा गेलो. लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर अशा भरपूर ठिकाणी आम्ही गेलो. आम्ही ठाणे, नवी मुंबई, भिवंडी इथे गेलो होतो. माझी गाडी का वापरली, हे पोलीस प्रशासनाला विचारा. मी थोडीच त्याचं उत्तर देणार. तुम्ही मलाच का घेऊन चाललात असं मी त्यांना कसं म्हणू शकत होतो. त्यांनी सांगितलं सोबत जा, गेलो", असे तांदळे म्हणाले आहेत. 

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाSantosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडPoliceपोलिस