शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

संतोष देशमुख प्रकरणी सुदर्शन घुलेने थेट भिवंडी गाठली, तिथून गुजरात...; कुठे कुठे हात पाय मारले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:36 IST

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण व हत्या झाली होती. यानंतर लगेचच घुले हा ११ डिसेंबरला भिवंडीत आला होता.

मस्साजोगच्या सरपंच हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून काढले असून मुख्य आरोपींच्या अटकेसाठी विरोधकांसह जनतेनेही सरकारवर प्रचंड दबाव आणला होता. यातूनच मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा असलेला वाल्मीक कराड याला सीआयडीकडे शरण येण्यास भाग पाडण्यात आले होते. आता फरार असलेल्या आणखी दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे देखील आता पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. या आरोपींनी पसार होण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते आता समोर येऊ लागले आहेत. 

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुदर्शन घुलेने थेट भिवंडी गाठली होती. तिथे त्याने मुळचे बीडकर असलेल्या विक्रम डोईफोडे यांच्याकडे मदत मागितली होती. परंतू, त्यांनी नकार दिल्याने घुलेने त्यांच्या साथीदारांसह गुजरातला पलायन केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. 

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण व हत्या झाली होती. यानंतर लगेचच घुले हा ११ डिसेंबरला भिवंडीत आला होता. त्यापूर्वी त्याने समाज कल्याण न्यास मार्फत काही मदत मिळते का हे पाहिले होते. तिथे त्याने जयवंत पाटील यांच्याकडे मदत मागितली. परंतू, त्यानी नकार दिला. यावेळी त्याने डोईफोडेंबाबत विचारणा केली, ते शहराबाहेर असल्याचे पाटील यांनी त्याला सांगितले. यामुळे घुले हा डोईफोडेंच्या मालकीचे असलेल्या वळपाडा येथील हॉटेलवर गेला तिथे त्याने लपण्यासाठी मदत मागितली. परंतू, तिथे त्याला नकार कळविण्यात आला. प्रसारमाध्यमांमध्ये फोटो फिरत असल्याने त्याने ओळख लपविण्यासाठी मिशी देखील कापली होती. भिवंडीत त्याने मिशी कापली होती.

मदतीची सर्व दारे बंद होत आहेत हे समजल्यावर त्याने हॉटेलमध्ये लघवीला जातो असे सांगून तिथून पलायन केले. तिथून तिन्ही आरोपी गुजरातला गेले. गुजरातमधील एका मंदिरात या लोकांनी १५ दिवस काढले, असे तपासात पुढे आले आहे.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडCrime Newsगुन्हेगारी