शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 20:21 IST

Veer Savarkar Defamation Case On Rahul Gandhi: दोनदा समन्स बजावले, राहुल गांधी गैरहजर राहिले; आता अटक वॉरंट निघणार? नेमके प्रकरण काय?

Veer Savarkar Defamation Case On Rahul Gandhi: वीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. परंतु, समन्स बजावूनही राहुल गांधी उपस्थित राहत नसल्यामुळे आता कठोर कारवाई करण्याची मागणी न्यायालयाला करण्यात आली आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात, असे सांगितले जात आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावणीस हजर होण्यासाठी १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

राहुल गांधी हे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. देशातील विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर होते. येथील न्यायालयाचे समन्स त्यांना मिळाले आहे. मात्र, दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असे राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीत मुदतवाढ दिली होती. तर, सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. अनेक महत्त्वपूर्ण विधेयके संसदेत चर्चेसाठी येणार आहेत. राहुल गांधी हे एका महत्त्वाच्या पदावर असल्याने त्यांनी लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे गांधी यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मिळून न्यायालयात उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. त्यानुसार हजर राहण्याबाबत पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी दिली आहे. 

सात्यकी सावरकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा चुलत नातू आणि नारायण सावकर यांचा सख्खा नातू सात्यकी सावरकर यांनी याबाबत माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना सात्यकी सावरकर म्हणाले की, वीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणात २०२३ मध्ये मी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. यासंदर्भात आज एक सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. ०२ डिसेंबरला राहुल गांधी यांनी न्यायालयात उपस्थित राहावे, अशी ऑर्डरही काढली होती. परंतु, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे राहुल गांधी उपस्थित राहू शकले नाही, असा बचाव त्यांच्या वकिलांनी केला, अशी माहिती सात्यकी सावरकर यांनी दिली.

संविधान घेऊन सर्व सभांमध्ये जातात, पण न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत

वीर सावरकर यांची बदनामी ही आमच्या संपूर्ण सावरकर कुटुंबासाठी चिंतेची बाब आहे. गंभीर बाब आहे. ही बाब आम्ही गांभीर्याने घेतलेली आहे. वीर सावरकर यांचे समर्थक आहेत, त्यांच्या तीव्र भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. समन्स बजावूनही राहुल गांधी न्यायालयासमोर येत नसतील, तर ते जे संविधान घेऊन सर्व सभांमध्ये जात असतात. सगळ्या सभांमध्ये संविधानाच्या बाजूने बोलत असतात. संविधानरक्षक सभा घेतात. त्याला काहीही अर्थ उरत नाही. न्यायालय हा लोकशाहीचा स्तंभ आहे. न्यायपालिकेचा आदर आपण केला पाहिजे. परंतु, राहुल गांधी यांच्या वर्तनावरून असे दिसून येत आहे की, न्यायालयाचे आदेश ते पाळत नाहीत, अशी टीका सात्यकी सावरकर यांनी केली.

दरम्यान, राहुल गांधी न्यायालयात हजर झाले नाहीत म्हणून त्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढावे, तसेच कलम १७४ तरतुदीनुसार त्यांना शिक्षा व्हावी, असा अर्ज दाखल केला आहे. यापुढील सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे. राहुल गांधी यांना दोन वेळा समन्स बजावले होते. पुढील तारखेला न्यायालयात उपस्थितीत राहिले नाही तर न्यायालय कठोर कारवाई करेल. राहुल गांधी पुन्हा अनुपस्थित राहिले, तर मात्र त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले जाऊ शकते, अशी माहिती आमच्या वकिलांनी आम्हाला दिली, असे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस