शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

स्पर्धा परीक्षांची भरणार ‘शाळा’

By admin | Published: October 05, 2016 6:34 PM

भारतीय प्रशासकीय सेवा, पोलिस सेवा व इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी शाळेपासूनच मार्गदर्शन केले जाणार आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.05 -  भारतीय प्रशासकीय सेवा, पोलिस सेवा व इतर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढविण्यासाठी शाळेपासूनच मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तोंडओळख करून देण्यासाठी शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 
स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. हे प्रमाण वाढविण्याच्यादृष्टीने उपाय सुचविण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन केले होती. या समितीने शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देण्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने प्रामुख्याने दहावीपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिका-यांमार्फत किमान दोन दिवसांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करणे, खासजगी संस्थांना अशी शिबीरे घेण्यास प्रोत्साहन देणे, करिअर मार्गदर्शन करणा-या शिक्षकांना सहभागी करून घेणे, नागरी सेवेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन अशा विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे. 
स्पर्धा परीक्षांची माहिती पाठ्यपुस्तकातमध्ये उपलब्ध करून देण्याचाही विचार आहे. सर्वोच्च प्रशासकीय पदांच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी मिळणे, समाजोपयोगी कामाचे अधिकार मिळणे, त्यातून समाजाचा विकास साधणे या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारी इंटरनेटवरील माहिती व वृत्तपत्रांचे वाचन वाढविण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रवृत्त केले जाणार आहे.