शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 08:49 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजपाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे वडील आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार आज संपणार आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. त्यामुळे भाजपासह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाचे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे वडील आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी एका सभेला संबोधित करताना सांगितले की, २८ मे २०२३ रोजी सुजय विखे पाटील आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटले. त्यानंतर ५ जून २०२३ रोजी राधाकृष्ण विखे पाटील आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली. भाजपाचे नेते काँग्रेसच्या नेत्यांना भेटताहेत आणि काँग्रेसवाले गाफील राहिल्यासारखे दिसताहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. या दाव्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यावरून विखेंचे विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला आहे. राधाकृष्ण विखेंकडून पुन्हा एकदा काँग्रेसकरिता धडपड सुरू झाली आहे, असं माझ्या कानावर आलं होतं. कुणाची सत्ता येणार हे त्यांना सर्वांच्या आधी लवकर कळतं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यानुसार त्यांनी आतापर्यंत पक्षांतरं केली आहेत. मागच्या २०-२५ वर्षांत ५-७ वेळा त्यांनी अशी पक्षांतरं केलेली आहेत. कार्यकर्त्यांसाठी काही धोक्याची घंटा वगैरे काही नाही. मला विचारल्याशिवाय काही होणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. ‘बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अशी बेजबाबदार विधानं करणं योग्य नाही’. यावेळी विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, ज्या जिल्ह्याचं तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या जिल्ह्यात तुम्ही काँग्रेसची एकही जागा आणू शकला नाहीत, स्वत:चं अपयश मान्य करा ना. वास्तविक मी मागे बोललो होतो की, भाजपामध्ये जाण्यासाठी ते उत्सुक होते. त्यांची कुणासोबत गुप्तभेट झाली, कुणासोबत चर्चा केली. हे मी सध्यातरी जाहीर करणार नाही. परंतु विधान परिषद निवडणुकीपासून त्यांची भाजपाकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र ती का थांबली, याचा खुलासा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून करावा लागेल, असे विधान विखे पाटील यांनी केले.  

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४