शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

मविआ नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांची मात्र वाढविली; जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा ‘जैसे थे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 09:16 IST

Milind Narvekar : जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती. आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

मुंबई : राज्य सरकारने मविआच्या पक्षांमधील माजी मंत्री व नेत्यांची अतिरिक्त सुरक्षा काढली आहे. त्यात बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, नाना पटोले, जयंत पाटील आदींचा समावेश आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढविण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात आमदार असले तरी गडचिरोलीत घर असलेले आणि या नक्षलग्रस्त जिल्ह्यात सातत्याने जाणारे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची वाय प्लस सुरक्षा काढण्यात आली. त्यांनी आपली सुरक्षा कायम ठेवावी असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. मिलिंद नार्वेकर यांना आधी एक्स सुरक्षा होती, आता ती वाय प्लस करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती. आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

ज्या लोकप्रतिनिधींची वाढीव सुरक्षा काढण्यात आली त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून देय असलेली सामान्य सुरक्षा तेवढी दिली जाईल. यापूर्वी बहुतेकांना वाय प्लस सुरक्षा होती. आम्हाला सुरक्षेची गरज नाही असे सरकारला वाटले असेल म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. माझी सुरक्षा काढलेली असताना माझ्या घरावर हल्ला झाला, तरीही अद्याप मला सुरक्षा पुरविलेली नाही, असा आरोप माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला.

कोणत्या नेत्यांची सुरक्षा काढली?छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नवाब मलिक, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुनील केदार, खासदार डेलकर परिवार, वरुण सरदेसाई.सध्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी ज्यांचा वाद रंगत आहे ते बडनेराचे आमदार रवि राणा यांना वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

टॅग्स :Milind Narvekarमिलिंद नार्वेकरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड