शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 7:00 PM

राजकीय सूड भावनेतून गद्दार सरकारने ठाकरेंची सुरक्षा कमी केली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला तर VVIP सुरक्षेबाबत समिती वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेत असते असं सरकारने म्हटलं

मुंबई - उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत कपात करण्याची माहिती समोर आली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केल्याचं कळताच ठाकरे गटाच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना आता झेड प्लसऐवजी झेड सुरक्षा देण्यात येणार आहे. तर आदित्य ठाकरे यांची वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली जाईल. परंतु या बातमीवर आता मुंबई पोलिसांकडूनही कुठलीही सुरक्षा कमी केल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यात जी अतिरिक्त वाहने होती ती हटवली असल्याचे म्हटलं आहे. 

राजकीय सूड भावनेतून गद्दार सरकारने ठाकरेंची सुरक्षा कमी केली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला तर VVIP सुरक्षेबाबत समिती वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेत असते असं सरकारने म्हटलं. परंतु पोलीस सूत्रांनुसार, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात अधिक वाहने होती आणि मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्यांच्याकडील ही वाहने प्रोटोकॉलनुसार काढून घेतली. उद्धव ठाकरेंना कालही झेड प्लस सुरक्षा होती आणि आजही आहे असं त्यांनी सांगितले. 

तर ठाकरे कुटुंबातील रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना वाय प्लस-स्कॉट कॅटेगिरीची सुरक्षा दिलेली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या कुटुंबाला कॉनवॉय म्हणून १-१ वाहन अतिरिक्त देण्यात आले होते. ती ३ वाहने सध्या हटवण्यात आली आहे. परंतु सुरक्षेच्या दर्जात कमी केली नाही. अलीकडेच राज्यातील मोटार परिवहन विभागाकडून अतिरिक्त गाडी परत मागितल्याचे पत्र प्राप्त झाले त्यानंतर या अतिरिक्त गाड्या हटवण्यात आल्या आहेत. 

विनायक राऊतांनी साधला निशाणाअख्ख्या जगातील दहशतवादी आहेत त्यांच्या हिटलिस्टवर मातोश्री आहे. वर्षानुवर्षे मातोश्रीला सुरक्षा होती, वेळोवेळी ती वाढवण्यात आली होती. परंतु राज्यात गद्दारांचे सरकार आल्यानंतर आजपासून मातोश्रीचे मुख्य प्रवेशद्वार ते आतपर्यंत खूप मोठ्या संख्येने कपात केली आहे. द्वेष आणि घाणेरड्या राजकारणामुळे ही सुरक्षा कमी करण्यात आली. दुसरीकडे ठाण्यात नगरसेवक, त्यांच्या पत्नीला, पीएलाही सुरक्षा देण्यात आली आहे. गद्दारांना सुरक्षा दिली जाते पण मातोश्रीची सुरक्षा कपात केली जाते हा निदंनीय प्रकार आहे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेMumbai policeमुंबई पोलीस