शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

‘महाराष्ट्रीयन्स’ची निवड सोपी नव्हती!

By admin | Published: April 06, 2016 5:12 AM

ज्या महनीय व्यक्तींनी देश आणि राज्य घडविण्यात महत्त्वाचे योगदान दिले, अशा सर्व महाराष्ट्रीयन्सना शोधण्याचे कार्य ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’च्या माध्यमातून झाले असल्याने

मुंबई : ज्या महनीय व्यक्तींनी देश आणि राज्य घडविण्यात महत्त्वाचे योगदान दिले, अशा सर्व महाराष्ट्रीयन्सना शोधण्याचे कार्य ‘लोकमत’च्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’च्या माध्यमातून झाले असल्याने, याचा आपल्याला मनापासून आनंद होत असल्याची भावना ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केली. मुंबईतील एनसीपीएच्या भव्य सभागृहात पार पडलेल्या ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर अवॉर्ड’ सोहळ्याचे प्रास्ताविक खा. दर्डा यांनी केले. ‘लोकमत’ची सामाजिक बांधिलकी, पुरस्कारासाठी नामांकितांची निवड आणि पारदर्शी निवड प्रक्रियेची विस्तृत माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘ही निवड एवढी सहज सोपी नव्हती. या पुरस्कारांची ही तिसरी एडिशन आहे. पहिल्या एडिशनमध्ये ज्यांना पुरस्कार मिळाला, ते आमीर खान इथे उपस्थित आहेत. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ज्यांना नॉमिनेशन्स मिळाले, ते सर्व आमच्यासाठी विजयी आहेत. आम्हाला या सर्वांच्या कार्याविषयी मनापासून आदर आहे, अभिमान आहे.’ ‘जगभरातील लाखो वाचकांनी ईमेल्सच्या माध्यमातून, तसेच ज्युरी मेंबर्सनी अचूक, सखोल, विस्तृत चर्चा केल्यानंतर, या मानकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये काम करणारे हिरे, मोती, रत्न आणि प्रसिद्धीपासून दूर राहून वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी ही सर्व मंडळी आदरणीय अशीच आहेत. गेल्या पुरस्काराच्या वेळी विदर्भाचे लाडके सुपुत्र देवेंद्रजी फडणवीस यांचे नॉमिनेशन झाले होते. पुढे ते मुख्यमंत्री झाले. यातून आमची निवड किती अचूक होती, हेच सिद्ध होते. यंदाचे नॉमिनी नितीन गडकरीजी हेसुद्धा आमच्या पुरस्कारांच्या पहिल्या एडिशनमध्ये नॉमिनी होते. आज ते केंद्र सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाच्या खात्यात कार्यरत आहेत.’ ‘आपल्या कार्याने ते देशावर छाप उमटवत आहेत, पण एका गोष्टीची खंत वाटते. ती म्हणजे, आमचे एका वर्षीचे नॉमिनी जे पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, ते आर. आर. पाटील आज आमच्यात नाहीत, त्यांची आठवण आज प्रकर्षाने होत आहे,’ अशी भावना खा. दर्डा यांनी व्यक्त केली. (विशेष प्रतिनिधी)