शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

Sushil Kumar Shinde: “चुकांमुळे काँग्रेस कमकुवत झाला, पंजाब पराभवासाठी ‘या’ २ व्यक्ती कारणीभूत”: सुशीलकुमार शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 13:07 IST

Sushil Kumar Shinde: सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक करत, सर्वधर्मसमभाव मानणारी युवकांची फळी तयार करायला हवी, असे म्हटले आहे.

मुंबई: देशभरातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालात काँग्रेसला सपाटून पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर काँग्रेसमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसमधील नाराज असलेल्या जी-२३ गटांच्याही काही बैठका पार पडल्या. काँग्रेसचा झालेला पराभव आणि काँग्रेसची एकूणच आताची परिस्थिती यासंदर्भात काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. यातच आता माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या पराभवावर भाष्य करत अप्रत्यक्षरित्या काँग्रेसच्या नाराज गटाचे समर्थन केले आहे. काँग्रेस हा अनेक चुकांमुळे कमकुवत झाला असून, पंजाबमधील पराभवाला दोन व्यक्ती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

सुशीसकुमार शिंदे यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहिला असून, यामध्ये निवडणुकांचे निकाल आणि एकूणच काँग्रेसमधील परिस्थिती यावर भाष्य केले आहे. निर्णायक लढतीत सतत येणार्‍या अपयशामुळे हा पक्ष अस्तित्वहीन होताना दिसतो आहे. स्वतःची ताकद असलेल्या पंजाबसारख्या राज्यातही लाथाळ्यांमुळे काँग्रेसला सत्ता राखता आली नाही. शेतकरी आंदोलनावरून स्थानिक लोकांचा भाजपवर असलेला रोष या पक्षाला मतांमध्ये परावर्तीत करता आला नाही. एका अर्थानं सगळीकडेच नेतृत्व आणि संघटनेच्या पातळीवर काँग्रेस कमकुवत होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे सुशीरकुमार शिंदे यांनी म्हटले आहे. 

देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी दिवसेंदिवस विस्तारतेय

देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी दिवसेंदिवस विस्तारत असताना एका मोठ्या पक्षाचे चिन्ह होणं लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नेमकं कुठं चुकलं, काय करायला हवे आणि देशातील सध्याची एकूणच राजकीय स्थिती यावरही सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मत मांडले आहे. सुशिलकुमार शिंदे यांनी आपल्या लेखात पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे खाप हे नवज्योतसिंह सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर फोडले आहे. पंजाबमध्ये या दोघांचे नेतृत्व कुचकामी ठरले आहे. दोघांच्या वर्तणुकीमुळे सरकार येऊ शकले नसल्याचा दावा सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पंजाबमध्ये ३२ टक्के मागासवर्गीय जनता आहे. त्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारा नेता मुख्यमंत्री असतानाही पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही. पंजाबमध्ये संघटन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी पक्ष कुमकुवत झाले, असे शिंदे यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. 

दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक केले आहे. अनेक कठीण प्रसंगात त्यांनी सरकार आणि पक्ष टिकवून ठेवला आहे. परिस्थिती पलटवण्यात त्या यशस्वी होतील. तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. जे काँग्रेस सोडून गेले आहेत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. तसेच सर्वधर्मसमभाव मानणारी युवकांची फळी तयार करायला हवी असे ते म्हणाले. 

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशिलकुमार शिंदेcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी