शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Puntamba Farmer Meeting: ठाकरे सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा पुणतांब्यात १ जून पासून धरणे आंदोलन, शेतकऱ्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 2:10 PM

ग्रामसभेत गावातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत ११ मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.

- मधु ओझा      पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे किसान क्रांतीच्या झेंड्याखाली आंदोलनाला दिशा देण्यासाठी आज विशेष शेतकरी ग्रामसभा सुरू करण्यात आली असून या सभेसाठी पुणतांबा रास्तपुर ग्राम पंचायत चे सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांची सर्वानुमते अध्यक्ष. म्हणून निवड करण्यात आली.

या ग्रामसभेत गावातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना 2017मध्ये झालेले आंदोलन हे मध्येच अर्ध्यावर सोडून आंदोलन संपले असे सांगितल्या नंतर शेतकऱ्यांनी आंदोलन न संपवत पुढे सुरू ठेवून आंदोलन यशस्वी केले. तसे करायचे असेल तर आंदोलन करून शेतकऱ्यांना फसवू नका. राजकीय पक्ष, नेत्यांपासून अलिप्त राहून आंदोलन लवकरात सुरू करावे या ग्रामसभेला भास्कर मोटकर, विठ्ठलराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, मुरलीधर थोरात, सुहास वहाडने, सुभाष वहाडने, सुभाष कुलकर्णी, नामदेवराव धनवटे, आबासाहेब नले, अनिलराव नळे, शाम माळी आदी उपस्थित होते. 

या आहेत मागण्या...

ठराव : १) ऊसासाठी प्रती टन १००० सरकारने अनुदान द्यावे. गाळप न झालेल्या उसाला २००००० रुपये हेक्टरी मिळावे          २)  सर्व शेतीमालाला एफ आर पी ठरवून कांद्याला ५०० रुपये अनुदान  मिळाले पाहिजे    ३) दिवसा वीज बारा तास मिळाली पाहिजे     ४) संपूर्ण वीज बिल माफ करण्यात यावे      ५) कांद्याची, गहू ची निर्यात बंद करण्यात येऊ नये       ६) सर्व पिकासाठी एक एस पी ला कायदा करून किमान किंमत ठरवावी.

७)अनुदान तसेच कर्जमाफी करिता कोणत्याही अटी शर्ती ठेऊ नये.

८)दुधाचा एफआरपी निश्चित करण्यात येऊन सरकारने तडजोड करून किमान किंमत लिटर ला ४० रुपये दर करावा 

९)पेरणी ते कापणी पर्यंत महाराष्ट्र रोजगार हमी मार्फत कामे करण्यात यावे

१०)वन्य जीव प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी,

११) 2017 रोजी झालेल्या आंदोलक शेतकऱ्या वर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे.

 

सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम

सर्व ठराव रीतसर तयार झाल्या नंतर या ठरावाच्या प्रती देऊन सात दिवसाची वाट पाहून जर सरकारने नमते धोरण घेत निर्णय घेतला तर आंदोलन  करणार नाही. पण सरकारने जर काही पाऊल उचलले नाही तर एक जून ते सात जून पर्यंत धरणे आंदोलन धरणे आंदोलन होईल.  जर सरकारने पाच जून पर्यंत काही प्रतिसाद दिला नाही तर आंदोलनाची दिशा वेगळी असणार असं सर्वानुमते ठरले. दोन दिवसात कोअर कमिटी, समितीची निवड दोन दिवसात होणार.  आभार विठ्लराव जाधव यांनी मानले.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन