शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

पेणमध्ये सात कुटुंबे वाळीत

By admin | Published: December 01, 2015 1:01 AM

पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील

अलिबाग : पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील, तसेच इतरांनाही क्षुल्लक कारणास्तव वाळीत टाकण्यात आले आहे. याबाबत गावकीच्या पंच, तसेच इतर ६ जणांविरुद्ध रायगड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील बेनेघाट गावातील ग्रामस्थ विष्णू म्हात्रे यानी शिंगणवट गावात घर बांधले यावरून चिडून त्याांना ८ वर्षांपूर्वी वाळीत टाकले. त्यानंतर शिंगणवटमधील सुनिता पाटील या विष्णू म्हात्रेंशी बोलल्या म्हणून त्यांना पाच वर्षांपूर्वी वाळीत टाकले. ममता पाटील (११) ही मुलगी सुनिता यांच्या घरी दूध देण्यासाठी गेली, म्हणून तिच्या सर्व कुटुंबास वाळीत टाकले. गावातीलच संध्या मोहिते याही पाटील कुटुंबाशी बोलल्या, म्हणून त्यांचा मुलगा रूपेश याचे केशकर्तनाचे दुकान दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आले . कोणी केस कापण्याकरिता दुकानात गेल्यास त्यासही वाळीत टाकले जाते. गावातील पंकज पाटील याने वाळीत टाकलेल्या ग्रामस्थांशी संबंध ठेवू नये, म्हणून गेल्या चार महिन्यांपूर्वी पोलीस पाटील सचिन कोठावळे यांनी पंकज, त्यांचे वडील व आई यांना जबर मारहाण केली, तसेच वाळीत टाकले. चंद्रकांत पाटील, मारुती पाटील, रूपेश मोहिते यांनाही वाळीतग्रस्तांशी बोलल्याच्या कारणांवरून वाळीत टाकण्यात आले, तसेच रूपेशला मारहाणही करण्यात आली. सातत्याने मानसिक त्रास दिल्याप्रकरणी शिंगणवट गावकीचे पंच अविनाश कोठावळे, स्वप्निल कोठावळे, कमलाकर पाटील, सतीश पाटील, गोपीनाथ म्हात्रे, परेश कोठावळे आणि अनंत कोठावळे या सात जणांविरुद्ध वाळीतग्रस्त बाळकृष्ण पाटील, शंकर पाटील, मनीराम पाटील, सुनिता पाटील, संध्या मोहिते, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील व भागुबाई पाटील या सात कुटुंबे प्रमुखांनी शुक्रवारी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांच्याकडे लेखी संयुक्त तक्रारी दाखल केल्या आहेत. गावकीचे पंच व पोलीस पाटील सचिन कोठावळे हे गावात दहशत माजवत आहेत. या सर्व प्रकाराबाबत वारंवार वडखळ पोलिसांत तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. या सर्व प्रकारांबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत. जर तत्काळ कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा या वाळीतग्रस्त कुटुंबांनी लेखी निवेदनात दिला आहे. (विशेष प्रतिनिधी)पेण तहसीलदार घेणार समन्वय बैठकरायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक या उभयतांना भेटून लेखी तक्रार निवेदन दिल्यावर, या अधिकाऱ्यांनी वाळीतग्रस्तांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी शिंगणवट गावातील या उभय गटांची समन्वय बैठक आयोजित करण्यात येत असून, त्यातून सामोपचाराने हे सामाजिक बहिष्काराचे प्रकरण मिटू शकेल, असे रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार म्हणाले.