शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

तीन वर्षांत सात पोलिसांच्या आत्महत्या

By admin | Published: September 18, 2016 2:45 AM

नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे.

पंकज रोडेकर,

ठाणे- कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण, याच कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारे मागील तीन वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील दोन महिला कर्मचाऱ्यांसह सात जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे. या घटनांमध्ये प्रामुख्याने स्वसंरक्षणार्थ दिलेल्या रायफल, रिव्हॉल्व्हर या शस्त्रांचा वापर झाला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या साडेपाच वर्षांत दोन हजारांहून अधिक जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे पोलीस आकडेवारी सांगते. यामध्ये विविध कारणास्तव आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण लक्षणीय आहे. या आत्महत्या त्यांना आलेल्या नैराश्येतून करीत असल्याचे बोलले जाते. बुधवारी रात्री तोच ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते बचावले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील परिमंडळ-१ आणि ५ या दोन परिमंडळांत २०१३, २०१४ या वर्षांत ठाणे, मुंबई आणि रेल्वे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६ पोलिसांनी टोकाची भूमिका घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेऊन आत्महत्या केली आहे. या घडलेल्या घटनांमध्ये कुटुंबांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनीही त्यांच्या खाजगी रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रोड अपघातात पाय गमावणारे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार भरत थोरात (५१) यांनी वर्तकनगर येथे स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहर मुख्यालयातील पोलीस टिपू सुलतान बालेखान मुल्लाने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. नौपाड्याचे पोलीस अच्युत शिंदे यांनी आजाराला कंटाळून गावी आत्महत्या केली. तत्पूर्वी, कळव्यातही अर्चना हिवरे या महिला कर्मचाऱ्याने रॉकेल ओतून पेटवून घेतले. तर, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वैशाली पिंगट यांनीही पोलीस ठाण्यातच ९ एमएम पिस्टलने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. तसेच शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या कॉन्स्टेबल दिलीप सिंगनवार (२८) याने एसएलआरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.>प्रकृती स्थिर: बुधवारी रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली.>मोकळेपणाने चर्चा केल्यास तणाव होतील दूरकाही मानसोपचारतज्ज्ञांनी बोलताना, प्रत्येकाला ताणतणाव असतो. त्याचा अतिरेक झाल्याने एखादा टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी लहानातले लहान तणावाचे विषय मनात न ठेवता दुसऱ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा करून ते दूर करावेत आणि या तणावातून मार्ग काढणे वेळीच गरजेचे असल्याचे सांगितले.