शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

सात महिलांनी केले पतीला किडनीदान!

By admin | Published: March 15, 2015 2:18 AM

अवयवदानाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांना कळले असून, सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सात महिलांनी पतीला किडनीदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत़

अवयवदानाचे महत्त्व पटले : सातही दाम्पत्ये जगताहेत निरोगी आयुष्यनासीर कबीर - करमाळा (जि. सोलापूर)अवयवदानाचे महत्त्व ग्रामीण भागातील लोकांना कळले असून, सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील सात महिलांनी पतीला किडनीदान करून त्यांचे प्राण वाचविले आहेत़ किडनीसारखा महत्त्वाचा अवयव देताना रक्ताचे नातेही पुढे येत नाही़, तेथे या महिलांनी पतीला आपली किडनी दान करून वस्तुपाठ घालून दिला आहे़ करमाळा शहरातील अशोकलाल बोरा, संजयकुमार देवी, अशोक क्षीरसागर, दशरथ कणसे, अनिल कणसे, अजित मसलेकर व किरण सूर्यपुजारी या सात जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे किडनीचा आजार जडला होता. मानवी शरीराची प्रक्रिया निरंतर सुरू राहण्यासाठी प्रत्येक अवयव तसा महत्त्वाचाच असतो़ त्यातही किडनी तर मुख्य अवयव़ त्यालाच विकार जडला तर माणसाचा जीवच धोक्यात येतो़ पण तन आणि मनाने एकरूप झालेल्या जिवाला अर्ध्यावर कसे सोडणार, या विवंचनेतूनच या महिलांनी पतीला किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला व तो प्रत्यक्षात आणला़ पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये या सातही जणांवर किडनी रोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली़ सातही दाम्पत्ये आज उत्तम व निरोगी आयुष्य जगत आहेत.आधुनिक सावित्री... संगीता अशोकलाल बोरा, सीमा संजयकुमार देवी, कमल दशरथ कणसे, सविता अनिल कणसे, स्वाती अजित मसलेकर, प्रतीक्षा किरण सूर्यपुजारी, प्रतीक्षा अशोक क्षीरसागऱस्त्रीच्या हृदयात माया, प्रेम, वात्सल्य व त्याग भरलेला आहे. जगाच्या पाठीवर आई, पत्नी, बहीण, मुलगी या नात्याची व्याख्या शब्दातीत आहे़ मला जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो़- अजित मसलेकर, रुग्णपती हाच परमेश्वर अशी धारणा मनात ठेवून किडनी दान केली़ यामुळे त्यांचे आयुष्य वाढले. मी स्वत:ला भाग्यवान व पुण्यवान समजते़- सविता कणसे