शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

सात वर्षांच्या मुलाची १५ लाखांसाठी हत्या

By admin | Published: March 04, 2016 3:42 AM

पंधरा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या कल्याणमधील एका व्यापाऱ्याच्या सात वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नयन संतोष जैन असे या मुलाचे नाव आहे

कल्याण : पंधरा लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या कल्याणमधील एका व्यापाऱ्याच्या सात वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नयन संतोष जैन असे या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र मोरे, विजय दुबे आणि देशराज कुशवाह या तिघांना अटक केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी गांधी चौकातील दुकाने बंद ठेवण्यात आली.गांधी चौकातील गजानन टॉवरमध्ये नयन राहत होता. तो कल्याणनजीकच्या सेक्रेड हार्ट स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत होता. त्याचे बुधवारी दुपारी अपहरण झाले होते. तो दुपारी ४च्या सुमारास सोसायटीच्या खाली शाळेच्या बसमधून उतरला. हे आईने घरातून पाहिले. मात्र, त्याच वेळी त्याला त्याच्या वडिलांच्या नयन किड्स या कपड्याच्या दुकानात पूर्वी काम करणारे दोन कामगार भेटले. त्यांनी नयनला त्यांच्यासोबत मोटारसायकलवरून फिरायला चलण्यास सांगितले. दोघेही ओळखीचे असल्याने तो त्यांच्यासोबत गेला. त्यानंतर, अवघ्या काही मिनिटांत नयनचे वडील संतोष यांना खंडणीसाठी फोन आला. १५ लाख रुपये न दिल्यास नयनला मारण्याची त्यांनी धमकी दिली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी वेगवेगळी पथके स्थापन करून तपास सुरू केला. आरोपींचे फोन ट्रेस केले असता ते वांगणी, मुरबाड परिसरात असल्याचे आढळत होते. त्याआधारे पोलिसांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. गुरुवारी सकाळी आरोपींनी संतोष जैन यांना टिटवाळा ते आंबिवलीदरम्यान ट्रेनमधून पैशांची बॅग फेकण्यास सांगितले. पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून पाठलाग केला. पैसे घेऊन पळणाऱ्या राजेंद्र मोरे आणि विजय दुबे यांना पकडले. त्यांनी नयन जिवंत असून तो मुरबाड येथे तिसरा साथीदार कुशवाह याच्या ताब्यात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यालाही अटक केली. तेव्हा त्याने नयनला जवळच्या जंगलात लपवल्याचे सांगितले. मुरबाड तालुक्यातील शिवळे गावातील खाटेघर नदीच्या पुलाखाली नयनचा मृतदेह आढळला. कल्याणच्या रु क्मिणीबाई रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नयनची बुधवारी रात्रीच गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अपहरणासाठी आरोपींनी वापरलेली मोटारसायकलही संतोष जैन यांचीच आहे. दोन दिवसांपूर्वीच ती चोरीला गेली होती. >२५ जुलै २००९ला डोंबिवलीतील यश शहा (वय ११) या विद्यार्थ्याचे खंडणीसाठी अपहरण झाले होते. त्याचीही हत्या झाली होती. २७ जुलैला त्याचा मृतदेह बदलापूरजवळ सापडला. २५ आॅक्टोबर २००९ला प्रिन्स जैन (वय १०) याचे अपहरण झाले. त्याची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. २ फेब्रुवारी २०१०ला तुषार सोनी (१२) याचे ५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले. त्याची हत्या झाली. ३ फेब्रुवारीला त्याचा मृतदेह आजदे गावात सापडला. १७ एप्रिल २०१४ला कल्याणमधील रोहन गुच्छेत (वय १२) याचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले. २१ एप्रिलला कल्याणमधील एपीएमसी मार्केटजवळ एका गोणीत त्याच्या मृतदेहाचे तुकडे आढळले होते.