शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

सातवा वेतन आयोग देता, मग हमीभाव का नाही?

By admin | Published: March 07, 2016 3:46 AM

सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही, असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे उपस्थित केला.

कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही, असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे उपस्थित केला.येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले, सर्वच पक्षांतील राजकारण्यांनी विश्वासार्हता गमावल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या नाम फाउंडेशनला सामान्य माणूसही आर्थिक मदत करत आहे. नाना यांनी आपल्या ‘खास शैली’त राजकारण्यांचा समाचार घेत त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. पेन, पाण्याची बाटली अशा सर्वच वस्तूंचे दर ठरलेले आहेत; पण शेतकऱ्यांच्या मालाचा भाव निश्चित नाही. परिणामी, तो आर्थिक अडचणीत येत आहे. आपल्या आई-वडिलांच्या आजारपणातील औषधोपचाराचा खर्च तो करू शकत नाही. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याला अपयश येते. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. आई, वडील, दोन लेकरांना मागे सोडून तो गळफास घेतो. बळीराजाला एकाकी वाटत आहे. तो निराश झाला आहे, असे नाना म्हणाले.अनेक संघर्ष करत मी येथे पोहोचलो आहे. अनेकवेळा फूटपाथवर झोपलोही. १०-१५ रुपयांत दिवस काढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता अडचणींना सामोरे जावे. आत्महत्या करणे हे षंडपणाचे लक्षण आहे. म्हणून अडचणीतील शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम नाम फाउंडेशन करीत आहे. शरद पवार माझे जवळचे मित्र आहेत. बाळासाहेब ठाकरे वडिलांच्या स्थानी आहेत. मात्र, मी कधी हात पसरला नाही. हात पसरले की किमतीचे लेबल लागते अन् मैत्री संपते, असे त्यांनी सांगितले.सरकार कोणाचेही असो, पहाट आमची होवो, अशी जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे निवडणुकाझाल्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची ‘तोंडे’ एकाच बाजूला असावीत. अन्यथा आमचे वाटोळे होते, असा टोला त्यांनी लगावताच हशा पिकला. (प्रतिनिधी)