शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
6
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
7
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
8
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
9
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
10
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
11
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
12
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
13
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
14
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
15
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
16
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
17
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
18
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
19
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
20
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास

शाहीस्नानासाठी नदी, तलावाचा वापर नको

By admin | Published: September 22, 2015 1:29 AM

कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबरला होणाऱ्या शाही स्नानासाठी नदी व तलावातील पाणी वापरण्यात येणार नसल्याची हमी राज्य सरकारने द्यावी

मुंबई : कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे २५ सप्टेंबरला होणाऱ्या शाही स्नानासाठी नदी व तलावातील पाणी वापरण्यात येणार नसल्याची हमी राज्य सरकारने द्यावी,असे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. याबाबत मंगळवारी प्रतिज्ञापत्र सादर करण्याची सूचना केली आहे. न्या़ अभय ओक व न्या़ ए़ एल़ अचलिया यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ यावेळी राज्य सरकारने १८ सप्टेंबरला झालेल्या शाही स्नानासाठी एक टीएमसी पाणी वापरण्यात आल्याची माहिती न्यायालयात दिली. राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी राज्य सरकार पाणी सोडत आहे, त्याला निर्बंध घालावा, अशी याचिका पुण्यातील प्रा. एच.एम. देसर्डा यांनी दाखल केली होती. त्यावर १४ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारला पाण्याच्या योग्य वापराबाबत निर्देश देतानाच याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळत १८ सप्टेंबरच्या शाही स्नानाबाबत अतिरिक्त पाणी सोडण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने राज्य सरकारने पाण्याच्या वापराबाबतच्या धोरण, त्याचा प्राधान्यक्रम काय आहे, अशी विचारणा केली. प्रथम पिण्यासाठी पाणीपुरवठा करायला हवा, शाही स्नानासाठीचा वापर अखेरचा असला पाहिजे, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने १२ वर्षांतून एकदाच ही पर्वणी येते़ हा धार्मिक व राष्ट्रीय सोहळा असल्याने भक्तांच्या भावनांचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. याबाबत सरकारी अभियोक्ता अभिनंदन वंग्यानी यांनी १८ सप्टेंबर रोजी एक टीएमसी पाणी वापरण्यात आले होते, आणि २५ सप्टेंबरच्या सोहळ्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येणार नसल्याचे यावेळी सांगितले.