शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
3
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
4
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
5
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
6
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
7
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
8
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
9
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
10
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
11
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
12
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
13
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
14
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
15
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
16
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
17
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
18
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
19
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
20
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

तटकरेंच्या परिषदेला आव्हाडांची दांडी

By admin | Published: January 17, 2017 4:16 AM

तटकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दांडी मारल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ठाण्याचे प्रभारी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यापासून ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांच्यापर्यंत सर्व नेते हजर असताना आव्हाड कुठे, अशी चर्चा सुरू झाली. याबाबत छेडले असता आव्हाड हे वेगळे नसल्याची सारवासारव तटकरे यांनी केली.साधारण वर्षभरापूर्वी बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांचे नाव आल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून त्यांंनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, प्रदेशपातळीवरून संजय भोईर यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. मात्र, भोईरांना हे पद देण्यावरून आव्हाड समर्थकांमध्ये नाराजी होती. ही नाराजी आ. आव्हाड यांनी बोलूनही दाखवली होती. तरीही, त्यांचा विरोध डावलून भोईर यांना हे पद दिले होते. भोईरांनी विरोधी पक्ष नेतेपदासह अनेक पदे भूषवल्यानंतरही सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आव्हाड व तटकरे एकत्र पत्रकार परिषदेला हजर राहिले, तर उभयतांना भोईर यांच्याबाबत एकच भूमिका घेणे अशक्य होईल आणि पक्षात मतभेद असल्याचे चित्र जाईल, त्यामुळे आव्हाड अनुपस्थित असल्याची जोरदार चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी तटकरे यांना छेडले असता, महापालिका निवडणूक काळात वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवली जाते. ते आपल्या कामात व्यस्त असतील, असे सांगत पक्षात स्थानिक पातळीवर कोणतेही मतभेद नसल्याचा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)>भोईर सत्तापिपासूविरोधी पक्षनेते संजय भोईर यांच्यासह त्यांचे वडील देवराम भोईर, उषा भोईर या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल तटकरे म्हणाले की, काही लोक सत्तेसाठीच जन्माला आलेले असतात. सत्तापिपासू माणसे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करीत असतात. दोनचार माणसे इकडेतिकडे गेल्याने पक्षाचे अस्तित्व कमी होत नाही. संजय भोईरांना पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिले होते. मात्र, आता काहीतरी घबाड मिळवण्यासाठी ते तिकडे गेले असले तरी त्यांचा तिथे भ्रमनिरास होईल. कारण, येथे राष्ट्रवादीच सत्ता स्थापन करणार आहे, असा दावाही त्यांनी केला. >निवडणूक आयोगाने दखल घ्यावीठाण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी ठाणे शहर भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी बॅनर आणि झेंडे लावण्यात आले होते. प्रशासनाने कायदा, नैतिकतेने कारवाई करणे गरजेचे असून निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. >नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवडचा दिला दाखलाठाण्यानंतर स्थापन झालेल्या नवी मुंबई महापालिकेने स्वत:चे मोरबे धरण विकत घेतले. पिंपरी-चिंचवड शहरही विकसित झाले आहे. मात्र, ठाण्याच्या सत्ताधाऱ्यांना ठाणेकरांची तहानदेखील भागवता आलेली नाही. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आपण पाटबंधारेमंत्री असताना प्रयत्न केले होते. मात्र, ठामपातील सत्ताधाऱ्यांनी केवळ टेंडरभोवती फिरत राहण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे पाण्याची समस्या अशीच रेंगाळत राहिली, असाही आरोप त्यांनी केला. >त्यांचा संसार सुखाचा होवो : पारदर्शक कारभाराच्या अटीवरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत युती करणार असल्याचे म्हटले आहे. याचाच अर्थ ठाणे आणि मुंबई महापालिकेतील कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार आहे. योग्य वेळी या कामांची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळे युतीची चर्चा अजूनही सुरूच आहे. त्यांचा संसार सुखाचा होवो, असा टोमणाही तटकरे यांनी लगावला.