शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
3
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
4
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
5
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
6
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
7
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
8
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
9
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
10
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
11
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
12
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
13
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
14
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
15
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
16
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
17
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

पवारांनी 'गियर' बदलताच गयारामांचे धाबे दणाणले !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 6:06 PM

एकूणच विरोधक आणि आरोप करणारे नेतेच पाठराखण करत असल्यामुळे पवारांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते धास्तावले आहेत. पक्षांतर करून गेलेले निवडून येणार नाहीत, असा गर्भित ईशारा दिल्याने गयारामांचे धाबे दणाणले आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांना मोठ्या प्रमाणात गळती लागली. सर्वच विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे. 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून  30 हून अधिक नेत्यांनी सत्तेसाठी पलायन. त्यामुळे राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत आव्हानही देऊन शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु,  शरद पवारांनी अचानक गिअर बदलल्याने सत्ताधाऱ्यांसह पक्षातून गेलेल्या गयारामांची चिंता वाढली आहे.

दिग्गज नेत्यांनी पलायन केल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष कमकुवत झाला होता. तसेच पक्षातील नेत्यांमध्ये उत्साह दिसत नव्हता. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेनंतरही राष्ट्रवादी निवडणुकीसाठी सज्ज झाला असं चित्र नव्हतं. हे चित्र बदलण्यासाठी अखेर पवारच बाहेर पडले.

याच महिन्यापासून पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. त्यात त्यांच्या सभांना होणारी गर्दी लक्षवेधी होती. तर साताऱ्यात पवारांनी छत्रपती उदयनराजे यांच्याविरुद्ध केलेले शक्तीप्रदर्शन चर्चेचा विषय ठरले होते. त्यामुळे राष्ट्रवादी कमबॅक करणार अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच पवारांना आलेली ईडीची नोटीस विरोधी पक्षासाठी संधीच म्हणावी लागेल.

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पवारांनी स्वत:हून ईडीच्या कार्यालयात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला होता. त्यातच विरोधकांकडून हे भाजपचे कृत्य असल्याचे सांगण्यात येत आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील पवारांना पाठिंबा दर्शविला. तर राजू शेट्टी, अण्णा हजारे आणि एकनाथ खडसे यांनी पवारांची पाठराखण केली.

एकूणच विरोधक आणि आरोप करणारे नेतेच पाठराखण करत असल्यामुळे पवारांना जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते धास्तावले आहेत. पक्षांतर करून गेलेले निवडून येणार नाहीत, असा गर्भित ईशारा दिल्याने गयारामांचे धाबे दणाणले आहेत.