शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

केंद्र सरकारने साखर निर्यात बंदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 1:42 PM

सध्या साखरेचे प्रचंड उत्पादन झाले असून, शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र, केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

अहमदनगर: सध्याच्या काळात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली. सरकारचे हे धोरण देशातील शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.

माजी केंद्रीय राज्यमंत्री तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्या यांच्यावरील "विधिमंडळातील बबनराव ढाकणे" या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. तसेच केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन झाले. त्यावेळी पवार बोलत होते. या कार्यक्रमास केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे,  माजी मंत्री बबनराव ढाकणे, आमदार निलेश लंके आमदार संग्राम जगताप,  माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

इथेनॉल सारखे पर्याय कारखान्यांना निवडावे लागणार आहेत

यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की,  सध्या साखर एके साखर निर्माण करून चालणार नाही. इथेनॉल सारखे पर्याय कारखान्यांना निवडावे लागणार आहेत. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प निर्मितीचा प्रकल्प सुरू केला ही कौतुकाची बाब आहे. आयुष्यभर बबनराव ढाकणे यांनी जनतेची सेवा केली. सरपंच, सभापती, आमदार, खासदार, मंत्री अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.  सर्व पदं त्यांनी सांभाळली व जनतेला न्याय देण्याचे काम केले. अन्यायाच्या विरोधात लढा दिला. त्यांचा वारसा प्रतापराव पुढे चालवत आहेत. या दुष्काळी भागातील जनतेने विशेषत: तरुणांनी प्रतापराव ढाकणे यांच्या मागे ताकद उभी करावी, असे आवाहन केले.

दरम्यान,  यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितिन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmerशेतकरीAhmednagarअहमदनगर