शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

"शरद पवार यांचे ‘ते’ विधान धादांत खोटे"; २००४च्या मुद्द्यावरून अजित पवार यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 1:50 PM

भाषणात अजित पवार यांनी शरसंधान साधताना १९९१ पासूनच्या शरद पवार यांच्या राजकारणावर भाष्य केले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात २००४ साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला असता, तर पक्ष फुटला असता हे शरद पवारांनी केलेले विधान धादांत खोटे आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शरद पवार यांनी याबाबत विधान केले होते. अजित पवार गटाची बैठक सोमवारी गरवारे क्लब येथे पार पडली. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी शरसंधान साधताना १९९१ पासूनच्या शरद पवार यांच्या राजकारणावर भाष्य केले.

ते म्हणाले, २००४ साली आम्हाला वाटत होते, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावा. मला तेव्हा मुख्यमंत्रीपदात रस नव्हता. तेव्हा भुजबळ मुख्यमंत्री होतील, असे मला वाटत होते. कारण राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा राज्याच्या काेनाकोपऱ्यात पक्ष पोहोचवण्याचे काम भुजबळांनी केले. पद्मसिंह पाटील हेही नवे नव्हते. १९९१ ला शरद पवारांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत जाण्याची वेळ आली तेव्हा एकत्र काँग्रेस होती. आम्ही सगळ्या आमदारांनी पद्मसिंह पाटील यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी दिले होते. पण शरद पवारांनी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केले. नाईक यांनी तेव्हा शरद पवारांचे काहीच ऐकले नाही, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम शरद पवारांनी केला. त्यासाठी आम्हा १७ लोकांना मंत्रिमंडळातून काढले. त्यानंतर १५ वर्षांनी २००४ साली मुख्यमंत्रीपदाचा विषय आला. तेव्हा सगळे नवखे नव्हते. नाईक यांना मुख्यमंत्री केले तेव्हा त्यांनी आपले ऐकले नाही, आता जर कुणाला मुख्यमंत्री केले, तर हे आपल्याला कायमचे दिल्लीला पाठवतील, त्यामुळे कदाचित त्यांनी २००४ साली मुख्यमंत्रीपद घेतले नसेल, असा टोला अजित पवारांनी लगावला.

‘...ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही’

महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो, तेव्हा आम्हाला सांगितले जायचे, शिवसेनेविरोधात टोकाची भूमिका घ्या.मी विचारायचो का? तर सांगितले जायचे शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याक समाजाला फार आनंद वाटतो. यावेळी तर अल्पसंख्याक समाज शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. त्यामुळे कुठे कसे गणित बदलते ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री