शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
3
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
4
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
5
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
6
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
7
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
8
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
9
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
10
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
11
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
12
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
13
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
14
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
15
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
16
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
17
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
18
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
19
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
20
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी

शरद पवार यांना ‘पद्मविभूषण’

By admin | Published: January 26, 2017 5:20 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष पी. ए. संगमा, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि मध्य प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष पी. ए. संगमा, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि मध्य प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा या चार राजकीय नेत्यांसह सात मान्यवरांना यंदाचा ‘पद्मविभूषण’ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान बुधवारी जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी बहुमान कोणालाही जाहीर झाला नाही.‘पद्मविभूषण’च्या इतर मानकऱ्यांमध्ये मल्याळी गायक येसुदास (केरळ), आध्यात्मिक गुरू जग्गी महाराज (तामिळनाडू) व ज्येष्ठ वैज्ञानिक-अभियंते प्रा. उडीपी रामचंद्र राव यांचा समावेश आहे. ‘पद्मभूषण’च्या सात मानकऱ्यांमध्ये रुद्रविणावादक पं. विश्वमोहन भट (संगीत), देवी प्रसाद द्विवेदी (साहित्य-शिक्षण), डॉ. थेम्टन उदवाडिया (वैद्यकीय सेवा, महाराष्ट्र), आचार्य विजयरत्न सुंदर सुरिश्वर म.सा. (आध्यात्म), स्वामी निरंजनानंद सरस्वती (योगविद्या), राजकन्या महा चक्री सिरिनधोर्न (शिक्षण, थायलंड) आणि चो रामस्वामी (पत्रकारिता, मरणोत्तर) यांचा समावेश आहे. एकूण ८९ ‘पद्म’ मानकऱ्यांमध्ये आठ महाराष्ट्रातील आहेत. त्यात प्रत्येकी एक पद्मविभूषण व पद्मभूषण तर पाच पद्मश्री आहेत. शरद पवार व डॉ. उदवाडिया यांच्याखेरीज कैलाश खेर (गायन), अनुराधा पौडवाल (गायन), भावना सोमय्या (पत्रकारिता), शेफ संजीव कपूर (पाककला), निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा) आणि डॉ. मापुसकर (समाजसेवा, मरणोत्तर) हे राज्यातील ‘पद्मश्री’चे मानकरी आहेत. मूळ महाराष्ट्रीय, पण अन्य राज्यांत काम करणाऱ्या डॉ. मदन माधव गोडबोले (उत्तर प्रदेश, वैद्यकीय सेवा) व कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता रघुनाथ भिडे (तमिळनाडू, समाजसेवा) यांनाही ‘पद्मश्री’ जाहीर झाले. यंदा भारतरत्न नाही यंदा कोणालाच ‘भारतरत्न’ जाहीर झालेले नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी दिवंगत जे. जयललिता यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांना भेटून केली होती. हा सन्मान शेतकऱ्यांना अर्पण करतो : पवारसार्वजनिक जीवनातील कार्यासाठी पद्मविभूषण सन्मान मिळाल्याबद्दल माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी आभार मानले आहेत. अन्नधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान अर्पण करतो, असे पवार यांनी म्हटले आहे. (सप्टेंबर १९९३ च्या भूकंपाच्या काळात) उस्मानाबाद व लातूरच्या जनतेने आणि (मार्च १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या वेळी) मुंबईकरांनी हार न मानता संकटांचा जो सामना केला, त्यांचे मी आभार मानतो, असे नमूद करून शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकारी यंत्रणेने त्यावेळी जे अथक प्रयत्न केले, त्यांचाही उल्लेख करायला हवा.