शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पवारांची खरी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 18:39 IST

शेतकरी प्रश्नावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही निशाणा साधला.

नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्यभर आक्रमक भूमिका घेतली असून 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चं आयोजन करण्यात येत आहे. आज दिंडोरी येथील आक्रोश मोर्चातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही जोरदार निशाणा साधला.

"आज आम्ही मोर्चा आणला, पण हा लढा इथेच थांबणार नाही. मी हा मुद्दा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने येणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही लावून धरणार. आपल्यातून तिकडे गेलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये चिंतन करत आहेत. पण पवार साहेबांची खरी राष्ट्रवादी ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आहे," असा हल्लाबोल जयंत पाटलांनी केला आहे. तसंच "जर तुम्ही विकासासाठी तिकडे गेले असाल तर या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहा. राज्याची तिजोरी तुमच्या हातात आहे. पीकविमा तुमच्या हातात आहे, शेती खाते तुमच्या हातात आहे. मग मुख्यमंत्र्यांना आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विचारण्याची काय गरज?" असा सवालही जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला केला आहे.

सरकारवर टीका करताना काय म्हणाले जयंत पाटील?

शेतकरी प्रश्नावरून सरकारचा समाचार घेताना जयंत पाटील म्हणाले की, "शेतकरी दारात आल्याशिवाय त्याला काहीच द्यायचे नाही हे सरकारचे धोरण आहे. म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मागणी केल्यानंतर फक्त राज्यातील काही भागात या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.आज सकाळी मी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होतो. त्यावेळी शेतकरी कुऱ्हाडीने द्राक्षाची झाडे तोडत होता. तीन-साडे तीन लाख खर्च करून जर एक रुपयाही मिळणार नसेल तर काय फायदा, असे त्या शेतकऱ्याचे म्हणणे होते. ही या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. या परिस्थितीत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे," अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

धनंजय मुंडेंना टोला

"कांदा उत्पादक शेतकरी या भागाचा महत्त्वाचा घटक आहे. पण याच कांद्यावर या सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. कांदा बाहेर पाठवता येत नाही आणि त्यामुळे कांदा इथेच सडतो. पीकविमा कंपन्या काही कारणे सांगून परतावा देत नाही. महाराष्ट्रात फसव्या पीकविम्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. कृषिमंत्री म्हणाले होते की, दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळेल. शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर दिवाळी साजरी करणार नाही. यांची दिवाळी जोरात झाली पण आमच्या बळीराजाला पैसे मिळाले नाही. त्यामुळे या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार