शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

‘ती’ बनली शेकडो अनाथांची माय

By admin | Published: May 08, 2016 3:39 AM

संसारात रमण्याच्या वयात विमलातार्इंनी अनाथालयाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि विमलाताई आज शेकडो निराधार मुलांच्या माय बनून राहिल्या आहेत.

- मंगेश व्यवहारे,  नागपूर 

संसारात रमण्याच्या वयात विमलातार्इंनी अनाथालयाची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि विमलाताई आज शेकडो निराधार मुलांच्या माय बनून राहिल्या आहेत. विमलताई आळे यांंनी विड्या वळून दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. दहावीनंतर त्यांना शिक्षक म्हणून ५० रुपये मासिक वेतनावर नोकरी लागली. नोकरी व ग्रामीण भागात समाजकार्य सुरू असताना, डॉ. भदंत आनंद कौशल्यायन यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. कौशल्यायन यांनी अनाथ मुलांसाठी निराश्रित गृह सुरू केले होते. परंतु त्यांच्याकडे गृहमाता नव्हती. त्यांनी विमलताईंना अनाथांची आई होशील का?, अशी विचारणा केली. तरुण वयात विमलताईंनी ही जबाबदारी स्वीकारली. उत्तर नागपुरातील जयभीम चौकात हे अनाथालय होते. विमलताईंवर सुरुवातीला पाच मुलांची जबाबदारी होती. अनाथालयाला उत्पनाचे साधन नव्हते, सुविधाही नव्हत्या. विमलताई कामठीतील शाळेत नोकरी करून अनाथालय सांभाळायच्या. मुलांची संख्या वाढत असताना पोटाला चिमटा काढून त्या अनाथ मुलांची भूक भागवू लागल्या. या वेळी काशीनाथ मेश्राम त्यांच्या मदतीला धावून आले. विमलताई व मेश्राम यांनी वर्गणी गोळा करून, पुस्तके विकून अनाथालयाचा गाडा चालविला. तीन वर्षानंतर अनाथालयाला ग्रॅण्ट मिळू लागली. विमलाताईंनी नोकरी सोडली. अनाथालयाचे ‘राहुल बालसदन’ असे नामकरण केले. अडचणींवर मात करून विमलातार्इंनी बालसदन नावारुपाला आणले आहे. बालसदनमधील १४ मुलींची त्यांनी लग्न करून दिली. आतापर्यंत २५० वर मुलामुलींचे संगोपन केले आहे. सध्या त्यांच्याकडे ३० मुले आहेत. मी जर संसारात रमले असते, तर एक दोन मुलांचाच सांभाळ करू शकले असता. सध्या २५० वर मुलांना सांभाळून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करून, सक्षम करू शकले, याचे फार मोठे समाधान मला आहे. - विमलताई आळे, संचालक, राहुल बालसदन