शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

दुष्काळग्रस्तांना महापालिकेच्या शाळेत निवारा

By admin | Published: April 26, 2016 2:35 AM

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्तांचे मुंबईतील स्थलांतर वाढले आहे.

मुंबई : राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्तांचे मुंबईतील स्थलांतर वाढले आहे. मुंबईत स्थलांतरित झालेले हे दुष्काळग्रस्त फ्लायओव्हरखाली अथवा मिळेल त्या जागी आपले बिऱ्हाड मांडत आहेत. परंतु येथेही त्यांना अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे. परिणामी दुष्काळग्रस्तांच्या निवाऱ्याची नीटनेटकी व्यवस्था व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्या शाळा उपलब्ध करून द्याव्यात, अशा आशयाचे निवेदन महापालिकेला धाडण्यात आले आहे.गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना यासंबंधीचे निवेदन पाठविले आहे. निवेदनात मुंबईत स्थलांतरित झालेल्या दुष्काळग्रस्तांना महापालिकेच्या शाळा तात्पुरत्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. मुंबईत स्थलांतरित झालेले बहुसंख्य दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील आहेत. विशेषत: लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांची संख्या मोठी असून, सध्या त्यांचे वास्तव्य घाटकोपरमधल्या भटवाडी येथील दत्ताजी साळवी मैदानात तात्पूरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या तंबूत आहे. (प्रतिनिधी)