शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

Maharashtra Politics: “वेदांता-फॉक्सकॉन प्रकरण दुसऱ्या राज्यात घडले असते तर उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 5:55 PM

गणपतीत २५० मंडळं फिरून आले. नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मुख्यमंत्र्यांना मंडळं फिरायचा वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. असा प्रकल्प जाण्याचा प्रकार दुसऱ्या राज्यात घडला असता, तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतला असता, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्याचे प्रकरण तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात अशा दुसऱ्या राज्यात घडले असते, तर तेथील मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता आणि तो घेतला असता. पण आपले मुख्यमंत्री बिझी आहेत. आधी दहीहंडी, गणपती, आता नवरात्रोत्सव आणि नंतर दिवाळीपर्यंत त्यांना वेळ नाही. गणपतीत २५० मंडळं फिरून आले आणि आता नवरात्रात ४५० मंडळं फिरतील. मंडळं फिरायचा मुख्यमंत्र्यांना वर्ल्ड बुकमध्ये रेकॉर्ड आणायचा आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

एअरबस आणि टाटा प्रकल्पांबद्दल सरकारला माहितीच नाही

आमचे सरकार असताना एअरबस आणि टाटा यांचे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, आताच्या सरकारला असे काही सुरू होते, याबाबत साधी माहितीही नाही. आम्ही सांगितल्यावर आता पाठपुरावा करतोय म्हणून सांगत फिरतायत. ही या सरकारची अवस्था आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. दुसरीकडे, बंडखोरांबद्दल पुन्हा एका तोंडसुख घेत, आपली चूक एवढीच झाली की, आपण त्यांना लायकीपेक्षा जास्त दिले. त्यांना अपचन झाले आणि हाजमोला खायला त्यांना पलीकडे जावे लागले. हे ४० लोक गद्दारीला बंड, क्रांती समजायला लागले आहेत आणि निर्लज्जपणे सगळीकडे फिरायला लागले आहेत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली.

दरम्यान, तुमच्यात हिंमत होती तर समोरून यायला पाहिजे होते. असं गद्दारांसारखे मागून पाठीत वार करायला नको होता. म्हणे आमच्या बंडाची नोंद ३३ देशांनी घेतली. पण तुमच्या बंडाची नाही, गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. महाराष्ट्रानंतर चांगलीच नोंद घेतली आहे. यांना उठाव करायचा असता, तर जागेवरच उभे राहिले असते. पण हे पळून गेले, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदे