शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

‘शिवसेना-भाजपावाले उद्या एकत्र येतील!’

By admin | Published: February 05, 2017 12:19 AM

मागील सव्वादोन वर्षांपासून सेना-भाजपाचा वाटून खाण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर आज हे वेगळे झाल्याचे दाखवीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

उस्मानाबाद : मागील सव्वादोन वर्षांपासून सेना-भाजपाचा वाटून खाण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर आज हे वेगळे झाल्याचे दाखवीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, आज एकमेकांना शिव्या घालणारे हे दोन्ही पक्ष निवडणुकांनंतर सत्तेसाठी एकत्र येऊन जनतेला फसवतील. त्यामुळे हा डाव ओळखून महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे शनिवारी काँग्रेसच्या राज्यातील प्रचाराचा शुभारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवराज पाटील चाकूरकर यांनीही आपल्या भाषणातून केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराचा समाचार घेतला. मागील काही दिवसांपासून काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारला जातो. मात्र, काँग्रेसमुळेच देशातील लोकशाही टिकून आहे. आज शेजारी राष्ट्रात काय होतेय, हे एकदा पहा आणि त्यानंतर काँग्रेसला सत्तर वर्षांत काय केले, ते विचारा, असे ते म्हणाले. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी गृहमंत्री असताना तिसरे सर्जिकल स्ट्राइक झाले होते. मात्र आम्ही त्याचा गवगवा केला नाही. मात्र या सरकारने त्याचा गैरवापर केला. (प्रतिनिधी)