शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अजित पवारांचा प्रयत्न फसल्याने, यापुढे भाजपच्या निशान्यावर शिवसेना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 17:16 IST

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेचे संबंध युती तुटल्यामुळे बिघडलेले आहेत. सहाजिकच भाजपच्या निशान्यावर यापुढे इतर राजकीय पक्षांव्यतिरिक्त शिवसेनाच प्राधान्याने राहणार आहे. 

मुंबई - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार स्थापन होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तेचा पेच आता सुटला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत दोन दिवसांपूर्वी ट्विस्ट आले होते. मात्र ते संकट टळले. परंतु, त्या घटनेमुळे भाजपच्या निशान्यावर आता सदैव शिवसेना राहणार हे स्पष्ट झाले. 

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस सरकार स्थापन करणार हे निश्चित झाल्यानंतर अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत जावून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष भाजपसाठी निष्कलंक झाला हे स्पष्टच होते. राष्ट्रवादी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्तेवर आलेल्या भाजपसाठी राष्ट्रवादीच मुख्य शत्रु पक्ष होता. मात्र अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे सर्वच समीकरण बदललं. 

विशेष म्हणजे अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सिंचन घोटाळ्याची त्यांची सुरू असलेली चौकशी थांबविण्यात आली. त्या संदर्भातील तपासही बंद कऱण्यात आला. अर्थात यामुळे राष्ट्रवादी पक्ष निष्कलंक असल्याचा संदेश गेला. त्यामुळे आता भाजपसाठी राष्ट्रवादीला धारेवर धरताना मर्यादा येणार आहेत. 

दरम्यान राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता येणार आहे. त्यातच भाजप आणि शिवसेनेचे संबंध युती तुटल्यामुळे बिघडलेले आहेत. सहाजिकच भाजपच्या निशान्यावर यापुढे इतर राजकीय पक्षांव्यतिरिक्त शिवसेनाच प्राधान्याने राहणार आहे.