शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

शिवसेनेच्या 'या' नेत्याची मागणी; 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेचं चित्रीकरण थांबवा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 14:47 IST

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपवण्यात येणार आहे अशी पोस्ट व्हायरल झाली होती.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि झी समुहाला भेटून विनंती करणार औरंगाबाद महापालिका निवडणुका तोंडावर शिवसेना नेत्याने केली मागणी त्यामुळे खबरदारी वेळीच घेतली पाहिजे - अर्जुन खोतकर

मुंबई - गेल्या काही दिवसापासून झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेचा प्रसंग दाखवण्यात येत आहे. औरंगजेबाच्या तावडीत संभाजी महाराजांचे हाल होताना दिसत आहे. मात्र संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे हाल पाहवू शिवप्रेमी पाहू शकत नाही त्यामुळे मालिकेतील चित्रीकरण थांबवा अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे. 

याबाबत एबीपी माझाशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, इतिहास लपवता येत नाही, लपवू शकत नाही हे खरं आहे. संभाजी महाराजांचे हाल कोणी केले हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे काही जण यातून खुरापती काढून राज्यातील वातावरण बिघडवू शकतात अशी भीती त्यांनी व्यक्त केली. म्हणून  त्यातून काही प्रसंग निर्माण होणार असतील तर त्याची खबरदारी वेळीच घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तर लवकरच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि झी समुहाला भेटून विनंती करणार आहे. संभाजी महाराजांचे हाल पाहवू शकत नाही, त्यामुळे हे चित्रीकरण थांबवावे अशी मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात स्वराज्य रक्षक संभाजी मालिका संपवण्यात येणार आहे अशी पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये शरद पवारांच्या दबावामुळे ही मालिका बंद होतेय असं म्हटलं होतं. मात्र याबाबत संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या प्रकरणात शरद पवारांना गोवण्याचा दुर्दैवी आणि अत्यंत हीन दर्जाचा प्रयत्न होतोय, त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे असं त्यांनी म्हटलं होतं. 

तसेच ही मालिका सुरुच राहणार आहे, कोणाच्या दबावामुळे मालिका बंद होतेय, या बातमीत कुठलंही तथ्य नाही जे कोणी अशा बातम्या पसरवून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी अमोल कोल्हेंनी केली होती. राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधत सत्ता मिळवली. त्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळलं अशी टीका होऊ लागली. त्यातच औरंगाबाद महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेने केलेल्या या मागणीवर विरोधकांकडून नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Swarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShiv SenaशिवसेनाArjun Khotkarअर्जुन खोतकरAurangabadऔरंगाबाद