शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शिवसेनेने उचलला भाजपमधील आयारामांच्या पाहुणचाराचा भार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 14:38 IST

शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे.

मुंबई - निष्ठावंत आणि आयारामांचा संघर्ष भाजपमध्ये वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याची पूर्वकल्पना असल्यामुळेच शिवसेनेने युती करताना सौम्य भूमिका घेतली आहे. किंबहुना भाजपमध्ये आलेल्या आयारामांच्या पाहुणचाराचा भारच शिवसेनेने उचलला आहे. खुद्द सामनातून शिवसेनेने याची कबुली दिली आहे.

शिवसेनेने युतीसाठी घेतलेल्या भूमिकेवर सामनामधून स्पष्टीकरण दिले. युतीत शिवसेनेला 124 आणि भाजपला 164 जागा असा फॉर्म्युला ठरला आहे. आग्रलेखात म्हटलं की, युती म्हटलं की देवाण-घेवाण आली. परंतु, यावेळी शिवसेनेला देवाण अधिक करावी लागली. भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षातील दिग्गज नेते भाजपमध्ये आले आहेत. या नेत्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर भाजपला मोठा घास देणे आवश्यक असून तो आम्ही मान्य केल्याचे शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे भाजपने शिवसेनेच्या जीवावर आयारामांचा पाहुणचार करण्याचा बेत आखला होता का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांनी प्रवेश केला आहे. त्या सर्वांना सामावून घेताना भाजपच्या नाकी नऊ येत आहेत. अशा स्थितीत शिवसेनेकडून वाढवून घेतलेल्या जागांवर आयारामांना संधी मिळत आहे.

शिवसेना-भाजप युती गेल्या कित्येक दिवसांपासून रेंगाळली होती. अखेर उभय पक्षांनी युतीची कोंडी फोडून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांना तगडे आव्हान मिळणार आहे.