शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचं विरोधकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:23 IST

हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतीय त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावे लागेल असं राऊतांनी सांगितले.

मुंबई - गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निकालाचे पडसाद आता सगळीकडे उमटू लागले आहेत. गुजरातमध्ये मागील २७ वर्षांची सत्ता राखतानाच भाजपाने याठिकाणी रेकॉर्डब्रेक कामगिरीच्या दिशेने वाटचाल केलीय. गुजरातचा निकाल अपेक्षित होता. याठिकाणी विरोधकांनी एकत्र येत निवडणूक लढवायला हवी होती तर भाजपाला काटे की टक्कर देता आलं असतं असं विधान शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, मतविभागणी झाली नसती तर विरोधकांना यश मिळालं असते. देशाच्या राजधानीत आपला मिळालेले यश कौतुकास्पद आहे. १५ वर्षाची सत्ता हिसकावून घेणे हे सोप्पं काम नाही. पण कदाचित दिल्ली तुम्हाला सोडतो आणि गुजरात आम्हाला सांभाळू द्या अशी तडजोड झालीय का अशी शंका आहे असं सांगत अप्रत्यक्षपणे राऊतांनी आप-भाजपात डिल झाल्याचा आरोप केला. 

तर हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतीय त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावे लागेल. देशाच्या पुढील निवडणुकीत आशादायक चित्र आहे. पण विरोधकांनी मतविभागणी टाळणं गरजेचे आहे. तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असं आवाहनही खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

राहुल गांधींचा संबंध नाही गुजरात निकालाचा संदर्भ राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेशी लावणं चुकीचे आहे. राहुल गांधी काँग्रेस अंतर्गत राजकारणापासून लांब आहे. देश जोडणे, लोकांची मने जोडणे, संघर्ष थांबवणे यासाठी राहुल गांधींनी यात्रा सुरू आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाशी राहुल गांधींना जोडणे योग्य नाही असं सांगत गुजरात निकालावरून राहुल गांधींना टार्गेट करणे योग्य नाही असं राऊतांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत