शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

...म्हणून त्यांनी राजकीय बॉसला पत्र लिहिलं; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:39 AM

पुण्यात कडकडीत बंद असेल त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी असं राऊतांनी म्हटलं.

नवी दिल्ली - जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्रालयाचा संपर्क जास्त होता. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असले तरी ते गृह मंत्रालयाच्या अख्यारित येतात. त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्तीबाबत गृहमंत्रालय काम करते. त्यांचे राजकीय बॉस गृहमंत्रीच असतात. त्यामुळे घटनात्मक प्रमुख राष्ट्रपतींपेक्षा राजकीय बॉस असलेल्या गृहमंत्र्यांना राज्यपालांनी पत्र लिहिले अशा शब्दात शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, आज पुण्यात बंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, कार्य पुणे, रायगडातून पुढे गेले. पुण्यात कडकडीत बंद असेल त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी. तुम्ही दिलेल्या पत्राचा परिणाम झाला नाही हे पुणेकर दाखवून देतायेत. पुण्याचे लोण राज्यभर पसरत गेले तर संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल. १७ तारखेला जो मोर्चा आहे. त्यात महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सहभागी आहेत. आमच्या दैवतांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू आंबेडकरांचा अपमान त्याविरोधात हा मोर्चा आहे. त्याची दखल केंद्र सरकारला घ्यावी लागेल असंही त्यांनी केंद्र सरकारला म्हटलं. 

राजकारण बाजूला ठेवा, देशाच्या सीमेकडे लक्ष द्या; राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं

सीमा प्रश्न इतका गौण आहे का?महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट रस्त्यावर झाली. ही सीमाप्रश्न सोडवण्याची जागा आहे का? जाता जाता, एअरपोर्ट लॉबीत सहज भेटले म्हणून बोललो. हा गंभीर प्रश्न आहे. सीमाप्रश्न खालच्या दर्जाचा आहे. जाता येता चर्चा होते का? कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्रावर हल्ले करताय. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. जाता जाता सीमाप्रश्नावर बोललो. ज्या प्रश्नावर ६० वर्ष संघर्ष पेटलाय त्यावर २ मिनिटांची चर्चा होते. सरकारच्या प्रसिद्धी विभागाचं आश्चर्य वाटतं असं सांगत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीEknath Shindeएकनाथ शिंदे