शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

Shiv Sena:"जनता शिंदे गटाची गाढवावरून धिंड काढणार, उद्धव ठाकरे त्यांना राजकारणातून उठवणार’’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 11:28 AM

Sanjay Raut: आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, मात्र काही दिवसांनी राज्यातील जनता तुमची गाढवावरून धिंड काढणार, असा इशाराही संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे. 

मुंबई - खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने ८ ऑगस्टपर्यंतची मुदत दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील बंडखोरांवर घणाघाती टीका केली आहे.  आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, मात्र काही दिवसांनी राज्यातील जनता तुमची गाढवावरून धिंड काढणार, असा इशाराही संजय राऊत यांनी बंडखोरांना दिला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग किंवा अन्य यंत्रणा काय आहेत हे सांगण्याची गरज नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर दिल्लीच्या आदेशाने, महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या आदेशानं ही वेळ आणली आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा वरून पाहतोय. आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा. 

तुम्हाला राज्यातील जनता राजकारणातून उठवणार आहेच. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. हे पैसे दिलेले फोडलेले लोक नाही आहेत. बंडखोर आम्ही उठाव केला, असं म्हणताहेत, पण कसला उठाव? या उठाव मधील उठा म्हणजे उद्धव ठाकरे आहे, ते तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना कुणाची पुरावे द्यावे लागणे हे दुर्दैव असल्याचे सांगत, संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, खरी शिवसेना कुणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी, यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. तुम्ही फुटलेले आहात, वेगळा गट तयार केला आहात. तुम्ही तुमच्या नवीन संसारात सुखाने राहा. पण दिल्लीश्वरांना शिवसेना संपवायची आहे, त्यांचं हत्यार म्हणून यांना वापरलं जातंय. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहोत. मराठी माणसाच्या हृदयात शिवसेनेला स्थान आहे. आज आमच्यावरती पुरावे सादर करण्याची वेळ आणताय, हे पाप तुम्हाला फेडावं लागेल. ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातलेत. ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजिर खुपसलाय, ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणलीय त्यांना राज्याची जनता माफ करणार नाही, आई जगदंबा माफ करणार नाही. पुरावा काय पाहिले या राज्याची जनता हाच पुरावा आहे. सीमाप्रश्नाच हुतात्मा झालेले शिवसैनिक हाच पुरावा आहे. या राज्याच्या मातीत कणाकणात मराठी माणसाच्या रक्तात शिवसेना आहे, हा पुरावा आहे. १०-२० माणसं फोडली म्हणजे हा पुरावा होऊ शकत नाहीत. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना