शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

शिवसेनेची राज्यपाल भेटीची खेळी भाजपचं टेन्शन वाढवणारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 16:20 IST

दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना आमदार राज्यपालांना भेटायला गेले आहे. भाजपवर दडपण निर्माण करण्यासाठी ही सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे.

मुंबई - राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेने देखील शेतकऱ्यांसाठी हालचाल सुरू केली आहे. त्यासाठी सेना आमदार राज्यपालांच्या भेटीला गेले आहे. भाजपवर दडपण टाकण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.  

शिवसेनेने आजच गटनेत्याची निवड केली आहे. या निवडीनंतर शिवसेनेने तातडीने राज्यपालांची भेट घेण्याचे निश्चित केले आहे. राज्यपालांची भेट सरकार स्थापन करण्यापूर्वी प्रामुख्याने घेण्यात येते. मात्र शिवसेनेने नेता निवडीनंतर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे भाजपकडून अनेक पक्षातील नेते आमच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या संपर्कात जे लोक आहेत, तेच आमच्याही संपर्कात असल्याचे राऊत म्हणाले. यावरून दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना आमदार राज्यपालांना भेटायला गेले आहे. भाजपवर दडपण निर्माण करण्यासाठी ही सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे.