शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिवसेनेला पुन्हा आठवले 'राम मंदिर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 12:02 IST

लोकसभा निवडणुक संपताच आणि विधानसभापूर्वी शिवसेनेला पुन्हा 'राम मंदिराची' आठवण होऊ लागली आहे.

मुंबई - बेंबीच्या देठापासून राम मंदिरासाठी आक्रमक होणाऱ्या शिवसेनेच्या अजेंड्यावरून लोकसभा निवडणुकीत अचानक ‘राम’ गायब झाला होते. युती होताच ह्या मुद्यावर शिवसेनेने नमती भूमिका घेतली होती. आता लोकसभा निवडणुक संपताच आणि विधानसभापूर्वी शिवसेनेला पुन्हा 'राम मंदिराची' आठवण होऊ लागली आहे. शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनामधून आज 'रामाचे काय होईल' असा अग्रलेख लिहण्यात आला आहे.

देशाच्या सत्तेवर रामाच्या विचाराचे सरकार आले आहे. देशात रामराज्य निर्माण व्हावे यासाठी कोटय़वधी जनतेने मोदींच्या हातात पुन्हा सत्ता दिली आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावे व त्यासाठी प्रयत्न करावेत हा काही अपराध नाही. अयोध्येत राममंदिर निर्माण व्हावे यासाठी शेकडो करसेवकांनी बलिदान दिले आहे. त्यांचे हौतात्म्य आणि रक्त वाया जाऊ देणार नाही अशा विचाराचे सरकार लोकांनी निवडून दिल्यावर रामाचे काम होणारच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा हेच म्हणाले आहे. असे सामनामधील अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.

मोदी यांनी रामराज्यासाठी विश्वास दाखवला आहे व हेच रामाचे काम आहे. राम मंदिर होणारच आणि मंदिर बनवण्यासाठी कोण विरोध करणार आहे ?. ज्यांनी विरोध केला त्यांना जनतेने घरी बसवले आहे. त्यामुळे रामाचा विजयरथ आता कोणी रोखू शकणार नाही. असे ही सामनामधून सांगण्यात आले आहे.

अग्रलेखात पुढे, सर्वोच्च न्यायालयानेदेखील पुरावे चिवडीत न बसता लोकभावना किंवा जनादेश मानायला हवा, असे म्हटले आहे. कायद्याच्या प्रकियेत राम मंदिरचा प्रश्न अडकवून बसू नयेत, अशी अशा सुद्धा लेखात व्यक्त करण्यात आली आहे.